Karunaashtake - 13

समर्थांच करुणाष्टक (१)

कडवे तेरावे....

समर्थ म्हणतात...

सुख सुख म्हणता दुःख ठाकोनी आले..
भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले...
भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना..
परम कठीण देही देहबुद्धी वळेना...!

समर्थ म्हणतात..

सुख,सधनता याचा शोध घेणे हा मनुष्याचा नैसर्गिक स्वभाव..!जन्माला आल्यापासून सुखकारक अस शोधत मानवाच मन फिरत असत..!
मानसिक,आर्थिक,शाररिक सुख शोधणे आणि त्यासाठी धडपड करणे हेच इतिकर्तव्य होऊन जाते..!
पण त्या सुखाच समाधानात रूपांतर कधीच होत नाही..!

 मग या सुखाची लालसा आणि समाधान यातली उरलेली जागा दुःख व्यापू लागते..!
दोन्हीतल अंतर वाढलं की दुःखाची व्याप्ती वाढते..!

रघुवीरा.. मग या सगळ्या मध्ये पारमार्थिक उपासना  करायच भान उरत नाही.!किंव्हा या सुख,दुःखाच्या ओढताणी मध्ये उपासनेची गरज आहे हे मन जाते..!दुःखाच सार मानसिक दुश्चित्तपणात उतरू लागत..!

रामा,मग दुश्चित्त मन हेलकावू लागत..खोटे आसरे शोधू लागत..फसवी नाती जोडू लागत..पण आपल्या आयुष्याच हीत ज्या तुझ्या रामाश्रयात आहे  ती कल्याणकारी दिशाच अंधुक होते..दूर होते..!

रामा,ह्या सगळ्या मानसिक ओढाताणीत देहाचे चोचले,देहाच्या भौतिक गरजा ह्या महत्वाच्या वाटू लागतात..चित्त तिकडेच धावू लागत..आणि त्यामुळे ती  तुझ्याकृपेची जी परम निरामय अशी पायवाट मी विसरू लागलोय..!

आपल्याला ही अशीच जाणीव होतेय ना??

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment