*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग १*
*भाग १*
*उपदेश देवुन दीधला मारुती |*
*स्वये रघुपती निरविता..||१||*
*निरविता तेणें झालो रामदास |*
*संसारी उदास म्हणऊनी..||२||*
समर्थ म्हणतात...
उपदेशाच्या दातृत्वातून येणारी विरक्ती अजूनच विलोभनीय असते.रामरायांनी तसाच मारुतीरायांना उपदेश केला.भक्तश्रेष्ठ अशी ख्याती असलेल्या मारुतीरायांना रामरायांनी प्रेमापोटी उपदेश केला तो विरक्तभक्तीचा..!
समर्थ म्हणतात..
भक्तीची अंतिम अवस्था विरक्तभक्ती. जिथं प्रेम,निष्ठा सगळं निर्गुण होत.आणि अभेदभक्ती,विरक्तभक्ती निर्माण होते.
समर्थ म्हणतात..
रामरायांच्या पदकमलापाशी मी जेव्हा सगुणत्वाचा हट्ट धरून बसलो तेंव्हा त्यांनी मला समजावलं.मला शिकवलं हेच विरक्तभक्तीच श्रेष्ठत्व.
समर्थ म्हणतात..
त्यामुळे आम्ही रामदास झालो.आणि या विरक्तभक्ती मुळे रामदर्शनाशिवाय प्रत्येक सांसारिक,प्रापंचिक गोष्टीत सम्यक उदासीनता निर्माण झाली आहे.आणि प्रापंचिक गोष्टींची जागा रामभक्तीने घेतली आहे.
प्रत्यक्ष रामाचे अनुग्रहित समर्थ.समर्थांचा प्रत्येक विचार,आचार हा रामाच्या अस्तित्वाने व्यापलेला.असे समर्थ रामाच्या उपदेशाविषयी या अभंगात सांगत आहेत
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२