समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*अजयो न हो रे जयवंत हो रे.|*
*आपदा नको रे बहु भाग्य हो रे..|*
*श्रीमंतकारी जनहितकारी.|*
*परऊपकारी हरि दास तारी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..मला षड्रिपुवर विजय मिळवायचा आहे पण तो मिळवल्याचा अभिमान मात्र नको आहे.मला त्या अभिमानावर ही जय मिळवायचा आहे.त्या सर्वप्रकारे मला जयवंत व्हायचं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..उपासनेत संकट नकोतच.किंव्हा अधीरतेने येणारी आशंका ही नको.पण मला त्यानंतर तुझ्या कृपेचे येणारे भाग्य मात्र अपेक्षित आहे रे..!

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..तुझी आम्हाला सर्वप्रकारे मानसिक,शारीरिक संपन्न करणारी वरदमूर्ती अतिशय आवडते.आणि त्यानेच सगळ्यांच खर हीत ही तू साधून देतोस.आयुष्य धन्य करून देतोस.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..असा तू जो प्रत्येकावर कृपेची छाया धरून प्रत्येकाचं आयुष्य कृतार्थ करणारा,तू माझ्या ही आयुष्याच कल्याण करून हा भवसागर तू तरुन न्हेशील याची खात्री आहे.

समर्थ आपल्या मनातली रामकृपेची आकांक्षा इथे व्यक्त करतात आणि ती व्यक्त करताना रामगुणगान करून ते रामदर्शन आपल्यासाठी खुल करतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे)*

🌺
*कोडे नको रे कळहो नको रे..|*
*कापट्य कर्मी सहसा नको रे..|*
*निर्वाणचिंता निरसी अनंता..|*
*शरणागता दे बहु धातमाता..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..आयुष्य असे भक्तीचा सरळ प्रवाह असावे.त्यामध्ये कोणतंही संकट नको.विकल्प नको.त्यामध्ये कोणताही विरोध आणि विरोधाभास नको रे..!

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..जगताना व्यवहार करताना छोटामोठा कुटीलपणा,आपमतलबीपणा करावा लागतो तो ही शक्यतो मला करायला लागू नये इतकं निर्मळ आयुष्य मला दे रे..!

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..मनुष्याला सगळ्यात मोठी चिंता,भय  असते ती मृत्यूची..!त्या मृत्यूच भय वाटावं इतकी मनाची साशंकता,तुझ्या भक्तीबद्दलची अनास्था होऊ देऊ नको रे..!

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..मी तुला शरण आलो आहे.या शरणागत अवस्थेत तुझी भक्ती हीच मला तरणोपाय आहे.ही भक्ती,ही उपासना करण्यासाठी तुझ्या निर्गुण रूपातील काही कल्पित लीळा आणि तुझे घडलेले मूळ चरित्र याची ओळख मला करून दे रे..!

समर्थ रामरायाकडे आयुष्य सफल आणि भक्तीपूर्ण होण्यासाठी कृपा मागत आहेत.आणि त्यासाठी अखंड शरण्यभक्तीची ही अपेक्षा करत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*रघुनाथदासा कल्याण व्हावे..|*
*अती सौख्य व्हावे आनंदवावे..|*
*उद्वेग नासो वर शत्रू नासो..|*
*नानाविळासे मग तो विळासो..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..माझ्यासारख्या रामदासांचे कल्याण व्हावे.जे कल्याण तुझी भक्ती करत तुझ्यात लिन व्हावे,समर्पित व्हावे..एकरूप व्हावे यात आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

ही रामकृपा आमच्यासारख्याच सर्वोच्च सुख आहे.इतर कोणत्याही ऐहिक सुखापेक्षा ही कृपा लाभण हे मला सुखासिन जीवनाची आनंदवल्ली वाटते आहे.ती मला मिळू दे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..तुझ्या या आनंदलहरींनी माझ्या मनातली दुश्चित्तता निरसून जावी.माझ्या मनातले शत्रूरूपी विकल्प आहेत ते नाश होऊ देत.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया.. एकदा तू माझ्या मनाला,तनाला माहिती झालास की मग माझ्या प्रत्येक सुखात,प्रत्येक आनंदात तू सुखवल्ली म्हणून विराजमान हो.म्हणजे हे सुख अक्षय होईल.

समर्थ रामाप्रति असलेल्या कृपेची अपेक्षा रामाला सांगतात. आणि त्या सुखाच्या योगाने प्रत्येक क्षणी,प्रत्येक आनंदात रामाला वसायची विनंती ही करतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*देवे दयाळे करुणा करावी.|*
*भक्ताभिमाने भरणी भरावी..|*
*हे रामनामी तरणी तरावी..|*
*दासा समस्ता वरणी वरावी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

देवाधिदेवा..तू दयाळू आहेस.तू कनवाळू आहेस.तू तुझ्या या ब्रिदाला जागून माझ्यावर दया कर.तुझी करुणापूर्ण नजर माझ्याकडे वळवून मला कृपांकीत कर.

समर्थ रामदास म्हणतात..

देवराया..माझं मन हे भक्तीने भरून दे.त्याची क्षणाक्षणाने वृद्धी कर.इतकी की भक्तीशिवाय,तुझ्या उपासनेच्या वृत्ती शिवाय कशालाही या मनात जागा ठेवू नकोस.इतकं मन भारून जाऊ दे.

समर्थ रामदास म्हणतात..

देवराया,रामराया मला अशी बुद्धि दे की तुझं नाम हे अशी नाव होईल जी हा भवसागर सहज पार करून मला पैलतीरावर,तुझ्याकडे घेऊन येईल.इतकं नामाच अधिष्ठान दृढ होऊ दे.

समर्थ रामदास म्हणतात..

देवराया..माझी दास्यभक्ती अजून दृढ करून घे.माझ्या भक्तबुद्धीने तुझ्या पूजनाचा योग मला वारंवार प्राप्त होऊ दे.आणि सर्वांग,सगुण,निर्गुण पूजनाचा संकल्प माझ्याकडून सदा होऊ देत.

समर्थ देवाकडे,रामाकडे अपेक्षा करतात की तुझी भक्ती,तुझं पूजन ही मूलतः सवय होऊ दे.तीच माझी दिनचर्या होऊ दे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*सीवर्णा मनाचा विपरीतवाणा..|*
*उदास वाटे बहुसाल प्राणा..|*
*मग राघवा रे तुज वाहिलो रे..|*
*कृपाळूवे सत्वर पाहिलो रे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

राघवा..भवभयाने जेंव्हा मी गलितगात्र होतो,मनाची अवस्था ही अतिशय विकल होते.जगणं असार होऊ लागते.

समर्थ रामदास म्हणतात..

राघवा..या विपरीत काळामुळे माझी भावनिक,मानसिक अवस्था अतिशय दोलनामय,करुण होऊन जाते.आणि कुशंकीत होऊन जाते.

समर्थ रामदास म्हणतात..

राघवा..ही अवस्था आल्यावर मी तुझ्यासाठी,तुझ्या प्राप्तीसाठी माझ्या साऱ्या इच्छा,आकांक्षा याचा त्याग केला आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

राघवा,आता फक्त तुझ्या सत्वर समीप बोलावण्याची,तुझ्या कृपेची मी यथावकाश वाट पहातोय. ही कृपा माझ्यावर करशील याची खात्री आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*ऋषी तापसी योगरासी विळासी..|*
*मनी चिंतिती राम लावण्यरासी..|*
*असंभाव्य त्या कीर्तिच्या किर्तीढाला..|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट जाला..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

नामात,भक्तीत तल्लीन झालेले भक्त,तपश्चर्येत लिप्त झालेले तापसी,अनेक सत्पुरुष घडवणारे ऋषीजन,हटनिग्रही साधुजन.. आणि त्याबरोबरच संसारात राहिलेले सांसारिक...!

समर्थ रामदास म्हणतात..

हे सारे येनकेन प्रकारे भक्ती,उपासना करून पुण्यसंचय करत आहेत.रामरायांची सगुण आणि मानसपूजा करत आहेत.

समर्थ रामदास म्हणतात..

या साऱ्यातून अपरिमित अशी कीर्ती पावलेल्या किर्तीनरेशाला,रामरायाला  पाहून,त्याच मनभावन अस दर्शन घेतलं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा रामप्रभूंना पाहून मन,शरीर,आयुष्य सारे पुलकित झालं आहे.आणि या उत्तम योगाने मी आनंदाची परिसीमा अनुभवतो आहे.

समर्थ त्यांच्यासाहित सगळ्यांच्या चिंतनात,मननात,स्मरणात असलेल्या रामाच्या प्रत्यक्ष दर्शनाने अतिशय आनंद पावलेले आहेत.आणि वरील पाच ओव्यात ते ही भावना व्यक्त करत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)*

🌺
*जेणे सोडिल्या देवकोटी अचाटा..|*
*सुखे चालती स्वर्गीच्या स्वर्गवाटा..|*
*प्रतापेचि त्रैलोक्य आनंदवीला..|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट झाला..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामप्रभु हा सर्वोच्च देव आहे ज्याने सगळ्या देवांना सत्वाचे आदर्श निर्माण करून दिले.आणि त्या सत्वाच्या महिरपीत देवत्व सिद्ध केलं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामप्रभुने त्याचे आदर्श दाखवून,त्यावर सज्जन लोकांना स्वर्गलोकीच्या सुखकर वाटा त्यागाने आणि सत्वबुद्धीने सुकर केल्या आहेत.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामप्रभुने असुरांशी युद्ध करून,असत्य,असत्व यांचा पराक्रमाने पराभव करून या त्रैलोक्यात आनंदवनभुवन प्रस्थापित केले आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

असा रामरायाचे दर्शन आज  करून मनाचा गाभारा सुखाने भरून जातो.त्यामुळे मनाची,आयुष्याची तृप्तता पूर्ण होते आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२