Karunaashtak - 14

समर्थांच करुणाष्टक(१)

कडवे चौदावे

समर्थ म्हणतात...

उपरती मज रामी जाहली पूर्ण कामी..
सकळभ्रमविरामी रामविश्रामधामी..
घडिघडि मन आता रामरूपी भरावे..
रविकुळटिळका रे आपुलेसे करावे...!

समर्थ आपल्या साधनकाळातल्या साधनेचे,रामदर्शनाच्या आतुरतीचे वर्णन जसे करतात तसेच या सर्व साधना संक्रमणाची फलश्रुती ही त्यांनी सांगितली आहे..!

रामा..तुझ्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग अनुतापा पासून सुरू होतो आणि मग तो उपरती कडे वळू लागतो..!उपरती ही निरिच्छा निश्चित नाही..पण उपरती ही मी आयुष्यभर केलेल्या कार्याच मनातून सिंहावलोकन आहे..!हे आणि हे करताना निर क्षीर बुद्धी प्रामाणिकपणे वापरली तर निर हा त्या घटनेचा अनुभव होतो आणि क्षीर आहे त्याला उपरती म्हणायला हरकत नाही..!
या माझ्या क्षीर विवेचनात तुझी प्राप्ती हीच माझ्या प्रत्येक कार्य आणि कर्तुत्वाची पूर्णता आहे हे माझ्या लक्षात आल्याने या सगळ्या आधीच्या आयुष्यातले सगळे किंतु,सगळ्या शंका,वेगवेगळ्या कार्यात निर्माण झालेले भ्रम,त्यापासून मिळालेली निराशा या सगळ्याच निराकरण,त्याचा विश्राम हा तुझ्याच समचरणात आहे..!हे मला आता कळून चुकलं आहे..!

रामा..इथपर्यंत तू आता मला घेऊन आलायस आता मात्र यापुढचा प्रत्येक क्षण मला तू अंतर देणार नाहीस अशी अपेक्षा आहे..!
कारण त्यासाठी लागणारी इंद्रियशुचिता,मनाची शुचिता,आचरण शुचिता हे सगळं आता माझ्या आयुष्याचा भाग होऊ चालला आहे अस मी समजतोय...आणि ते मला आवडू ही लागलं आहे..!

रामा..या सगळ्या माझ्यातल्या आत्मारामाला जाग करण्याच्या तुझ्या कृपेमुळे या जगातली इतर सगळी भौतिक,शाररिक सुख बाजूला करून तुझ्या प्रत्येक सस्वरूपाला तनामनात भरून घेण्याची तयारी मी केलेली आहे..!

रामा..आता ही माझी अपेक्षा पूर्ण करशील हे मागण ही मी तुझ्याचपाशी आग्रहाने करतोय..!

समर्थासारखं रामाजवळ हे आग्रहाने मागण्याइतपत योग्यता कधीतरी आपल्याकडे येऊ शकेल..?
खरतर यायला पाहिजे..!!!

श्रीराम..

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment