*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-२*
🌹🌺
*गंडस्थळे झिरपती बहु वास जेथे..|*
*सुवासमस्त रिझले अळीकुळ तेथे..|*
*शुंडा प्रचंड मिरवी गजकर्णथापा..|*
*तेजाळ अंकुश म्हणे दुरितासि कापा..||*
🌹🌺
समर्थ रामदास म्हणतात...
गणराजाच्या या विशाल रूपाने थक्क होऊन पहात असताना जाणवते की त्याच्या गंडस्थळातून वीरश्री,पौरुषी मद झिरपतो जो त्याच्या भाळावर कायम विराजत असतो.
समर्थ रामदास म्हणतात..
त्या मदा ने उन्मत्त झालेली गणराजाची भृकुटी आणि एकूणच भाळप्रदेश त्याच्या अलिप्त सुवासाने अधिकच उत्तेजित अशी वीरश्री, पौरुषेय वीरश्री प्रदर्शित करते आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
अतिशय चपळ अशा सोंडेने हा गणराज जेंव्हा आनंद प्रदर्शन करत असतो तेंव्हा भल्या मोठ्या कर्णयुगुलांच लयबद्ध फडकावण ही प्रचंड अशी अभेद्य मोदतांडवाची सुरुवात असते.
समर्थ रामदास म्हणतात...
ह्या सगळ्या आनंदतांडवा मध्ये तळपणारा अंकुश सदा तल्लख असतो.या साऱ्या आनंदतांडवामध्ये विघ्न आणणाऱ्या असुर प्रवृत्तीचा नायनाट करण्याचं सामर्थ्य सदा हा गणपती बाळगून आहे.
समर्थांना प्रत्येक देवतेमध्ये असणारे अपूर्व असे भक्तवत्सल रूप भावते तसे त्या त्या देवतांच्या अंगभूत असणारी वीरश्री ही समर्थाना अतिशय प्रिय आहे.ह्या ओवीत समर्थ विरगणपती स्वरूपात विशाल असलेल्या गजाननाचे वर्णन करत आहेत.
जय गजानन..!
जय श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२