समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*सकलगुणनिधीचा राम लावण्यसिंधु..|*
*अगणित गणवेना शक्तिरूपे अगाधु..|*
*प्रबळ बळ चळेना वाउगे व्यर्थ कामी..|*
*म्हणवूनी मन रामी लागले पूर्णकामी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

हा राम सर्वगुणसंपन्न असा एक पुरुषोत्तम आहे.याचे मनाचे सौंदर्य,याचे घननिळ असे शरीरशौष्ठव,त्याची अलौकीक अशी कारुण्यशक्ती आणि मनमोहक असे अजोड असे मनोहर दर्शन हे सारे केवळ मनभावन आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामाचे अनेक गुण,अनेक शक्ती अशा आहेत की ज्याची मोजणी ही करता येत नाही इतका तो अगाध आणि असीम आहे.किंबहुना हा राम ह्या अनेक शक्ती,माया यांचच एक सगुण रूप आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हा राम सान्निध्यात असताना इतर कोणत्याही प्रबळ शक्ती,मोह,माया आपल्याजवळ येत नाहीत. परमार्थाशिवाय व्यर्थ अशा कोणत्याही कामात मन जात नाही.

समर्थ रामदास म्हणतात..

या साऱ्याचा सुंदर असा परिणाम असा झाला आहे की हे मन रामाच्या संकीर्तनात पूर्णपणे गढून गेले आहे.इतर कोणत्याही व्यवधानात आता रमेल अस वाटत नाही.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विमळगुणशिळाचे आदरे गुण गावे..|*
*विमलगुणशिळाचे दास वाचे वदावे..|*
*विमळगुणशिळाचा अंतरी वेध लागो..|*
*विमळगुणशिळाचा रंगणी रंग गाजो..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

दायार्द्र अशा मनाने परिपूर्ण अशा राममूर्तीचे प्रत्येक गुण नेहमी गावे.त्याचे चिंतन करत त्या गुणांचे आचरण आपण कसे करता येईल याचा विचारही करावा.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा सर्वकृपाळू राममूर्तींचे तन,मनाने आपण दास म्हणवून घ्यावे.म्हणजे असे रामदास होणं हे रामापर्यंत जाण्याचा राजमार्गच आहे हे सर्वमान्य आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या सर्वव्यापी सर्वसाक्षी राममूर्तीची मनातून आतुरता निर्माण व्हावी इतकी की त्याच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपातला फरक कळू नये.इतकं रममाण व्हाव.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा रंगधीर रामरायाच्या सगुणराममूर्तींच्या भक्तरंगात रंगून स्वतःच अस्तित्व त्यात विसरून जावे.केवळ रामरंगी होऊन जावे.रामतल्लीन होऊन जावे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*बहुविध भजनाची दैवते पाहिली हो..|*
*सकळ त्यजुनि रामी वृत्ति हे राहिली हो..|*
*विमळगुणशिळाची लागली प्रीति मोठी..|*
*विमळ हृदय होता उद्धरे कूळकोटी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

विविध दैवते,पंथ यांची उपासना करणारे अनेक भक्त पाहिले.त्यांचं अवलोकन केलं.त्यांची संकीर्तन पद्धती अभ्यासली.ती विविध दैवतांचे ही पूजन केले..!

समर्थ रामदास म्हणतात...

पण सगळ्यात शेवटी जेंव्हा रामरायांच्या पायाशी आलो तेंव्हा सगळ्या दैवतांचे सार मला या राघवमूर्तीत दिसले.आणि मग मन,तन, वृत्ती या त्याच्या संकीर्तनात कायमचा लिन झालो.

समर्थ रामदास म्हणतात...

या रामरायांच दायार्द्र मन,त्याची करुणापूर्ण दृष्टी, त्याच मनोहारी सर्वांग दर्शन याची अवीट अशी गोडी मनाला प्रेमात पाडणारी आहे.त्यात कायमच गुंतून राहील अस त्याच श्रेष्ठत्व दिसून येत.

समर्थ रामदास म्हणतात..

एकदा का या रामरायांच्या संकीर्तनाची आवड मनात जागु लागली,हृदयात वसू लागली की स्वजन्माचा उद्धार होतोच पण त्याबरोबरच अनेक आधीच्या कुळांचाही उद्धार होऊन सकल आयुष्य कृतार्थ होते...!

श्रीराम..!!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*कमळनयनरामे वेधिले पूर्णकामा..|*
*सकळभयविरामे राम विश्रामधामे..|*
*घननिळतनुश्यामे चित्ततोषे आरामे..|*
*भुवनभजननेमे तारिले दास रामे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

हा रघुराज आपल्या कमळाच्या आकाराच्या तृप्त नजरेने आपल्या मनातलं सगळं इच्छित जाणून घेतो आणि ती पूर्ण करायचा कृपाप्रसादाने प्रयत्न करतो.

समर्थ रामदास म्हणतात..

हा रामराया आपल्या मनातली सगळी भय,विकल्प संपवून देतो आणि मन एका सदाविश्राम अवस्थेत आणून त्याच्यात सामावून घेतो.

समर्थ रामदास म्हणतात..

घननिळवर्णी अशा  रामराजाच दर्शन हे चित्ताच परिपालन,पोषण तसेच आनंद भरून आत्मज्ञानी सुख आराम देणार आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामसंकीर्तनाने या जगातील प्रत्येक जीविताना एक आधार मिळालेला आहे.त्या आधारे रामरायाने सगळ्यांना हा भवसागर तरुन जाण्याची अध्यात्मिक,मानसिक शक्ती प्रदान केली आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*रविकुळटिळकाचे रूपलावण्य पाहे..|*
*रविकुळटिळकाचे चिंतनी चित्त राहे..|*
*रविकुळटिळकाची कीर्ती जीवी भरावी..|*
*रविकुळटिळकाची मूर्ती ध्यानी धरावी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रघुराज हा सूर्यवंशी आहे.त्याच तेज या वंशाला साजेसं दिगंत आहे.अपरंपार आहे.आणि ते तेज त्याच्या पुरुषी शौष्ठवात खुलून दिसत आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

ह्या सूर्यवंशी रघुराजाचे अनेक प्रकारच्या कथांमधले चरित्र,अनेक स्तोत्रामधील मंगल असे वर्णन आठवत आपले मन त्याच्या ठायी कायम सुपूर्द करावे. लिन व्हावे.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा रघुराजाचे पराक्रमी स्वरूप,त्याची क्षमा आणि भक्तवत्सल अशी भूमिका आठवत ती आपल्या मनात कायम उतरवत ठेवावी.

समर्थ रामदास म्हणतात..

रघुराजाचे मनस्वी ध्यान तन,मनाने करत आपल्या आयुष्याचा हा मार्ग त्याच्याकडे घेऊन जाईल अश्या भक्तीच्या पायवाटेने  कायम आपल्यासमोर उपासनेने सिंचित करत जावी.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*आनंदकंद रघुनंदन शोभताहे..|*
*कंदर्पकोटी वदनी उपमा न साहे..|*
*आकर्ण पूर्णनयनी रमणीय शोभा..|*
*विस्तीर्ण कीर्ण भुषणी जगदीश उभा..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

तो रघुराज सर्व आनंदाचा गाभा आहे.ज्याच्या अस्तित्वातून सारे आनंदपथ निर्माण होतात..आणि ज्याच्या चरणाशी सगळे आनंदपथ शरण जातात.असा रघुनायक एका दैदीप्यमान आदर्शासारखा शोभून दिसतो आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

अतिशय मुग्ध असे हे पुरुषी सौन्दर्याची एक खाण असलेला हा रामराय तो त्यांच्या सुहास्यवदनी,लाघवी असे स्वरूप दर्शन देतो.की ज्याची तुलना दुसऱ्या कशाशीही होत नाही.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामरायाचे मुखावलोकन करताना त्याचे पूर्ण मत्स्यनयन त्याच्या कानापर्यंत गेलेल्या रमणीय अशा प्रदेशाचे अत्यंत उत्कट असे दर्शन साध्य होते.

समर्थ रामदास म्हणतात..

असा हा रामराय आपलं हे आश्वस्त रूप घेऊन,तिन्ही त्रिकाळ हा जगनियंता जगाच्या कल्याणासाठी आपले आशीर्वादयुक्त वैभव दाखवत सदा दक्ष उभा आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*सुवर्णवर्ण बहुवर्ण किरणे अपारे..|*
*मिश्रीत ते तळपती घन थोरथोरे..|*
*उंचावले गगन त्याहुनी उंच भासे..|*
*मुक्ताफळी जडित मंडप तो विळासे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

हा रामराय जो सूर्यकुळाचा आहे.त्याच्या अस्तित्वात सुर्यकिरणांच तेज,आणि  रामरायाच स्वतःच सत्वतेज यांच्या किरणांची उधळण कोटी कोटी स्वरूपात वृद्धिंगत होत आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

ह्या अतीव तेजाने मेघवर्णी रामराया आणि त्याभोवतीची आभा हे अजूनच तळपुन अमोघ असे तेजोवलय निर्माण करत आहेत.

समर्थ रामदास म्हणतात..

या साऱ्या तेजोगोलामुळे गगन जे अस्तित्वात आहे हे हर्षोउन्मादीत स्वरूपात अजूनच उंच भासू लागले आहे.त्याचा विस्तार हा ब्रह्मांडा पलीकडे ही होऊ लागला आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या साऱ्या मंडपावर जडलेले ऐश्वर्यसंपन्न मोत्यांचे हार ह्या साऱ्याची शोभा अजून द्विगुणित करत आहेत.

श्रीराम..!!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२