समर्थांची करुणाष्टके (५) कडवे सोळावे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे सोळावे...

समर्थ म्हणतात..

सोडविल्या देवकोटी..
भूभार फेडिला बळे..
भक्तांसी आश्रयो मोठा.
बुद्धि दे रघुनायका...!

रामराया..तुझी कीर्ती अशी आहे देवाधिकांच्या संकटसमयी तू धावून येऊन,वेळोवेळी विविध सात्विक,तामसिक अवतार घेऊन त्यांची संकटातून सोडवणूक केली आहेस.

रामराया..देवाधिकांबरोबर त्यांच्या अनेक भक्तांसाठी ही तू संकटमोचन होऊन त्यांच्यावर सुखाची सावली निर्माण करतोस..!
रघुनायका..हे सगळं करतोस च याचा अर्थ माझी मूढमती तू सहज बदलून मला सत्व बुद्धि देशीलच..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment