*समर्थरचित चौपदी..*
*भाग १*
*कोमळ वाचा दे रे राम..*
*विमळ करणी दे रे राम.*
*प्रसंगओळखी दे रे राम.*
*धूर्तकळा मज दे रे राम!*
समर्थ म्हणतात..
रामराया...माझ्या शरीरातले जीभ,तिने प्रकट केलेले उच्चार आणि त्यायोगे निर्माण होणारे संभाषण अर्थ यावर सगळी आयुष्यातली मदार आहे.तीच हे स्वरूप कोमल असावं असं समर्थ म्हणतात.निग्रह सुद्धा निक्षून सांगावा लागू नये इतका सहजपणे व्यक्त व्हावा..!त्याला कोणत्याही हट्टाची किनार असू नये.अशी वाचासिद्धी मिळण्यासाठी समर्थ रामरायाकडे मागण मागतात.रामराया..माझी वाणी ही सोशिक,प्रेमळ,आल्हाद आणि नेमकी अशी दे..!!
समर्थ म्हणतात...
रामराया,वाचा किंव्हा वाणी यानंतर वेळ येते कृतीची.विमळता म्हणजे सहज आणि सहृदय.कोणीतही कृत्य हे सहृदय म्हणजे खलप्रवृत्ती शिवाय माझ्या हातून घडू दे.किल्मिष आणि कुटीलतेचा स्पर्श माझ्या कुठल्याच कृत्याला असू नये..!अशी कृत्य करायची बुद्धि मला रामा तू दे रे..!
समर्थ म्हणतात...
रामराया.. आयुष्य जगताना येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाची खरी ओळख मला करून दे.तो प्रसंग मला आरस्पानी बघायची कला मला मिळू दे.अनेक प्रसंग वरकरणी दुःखदायक वाटले तरी त्याचा गाभा,परिणाम सुखाचा असतो.किंव्हा अनेक प्रसंग सुख देणारे वाटले तरी त्यातून खेद, दुःख निर्माण होत.अशा प्रसंगाची नेमकी ओळख मला करून दे रे रामराया..!!
समर्थ म्हणतात..
रामराया..आयुष्यात अनेक वेळा असंगाशी संग होण्याची वेळ येते.अशा वेळी या अर्थहीन असंगी व्यक्ती,घटनांना बगल देऊन शुद्धता मनात जागती ठेवावी लागते.समाजात कुठल्याच घटकांना दुखावून चालत नाही.म्हणून एकप्रकारच चाणाक्ष,धूर्त अस वळण देऊन आपला मार्ग स्वच्छ आणि सुरक्षित राखण हेच हिताचे असते.रामराया..मला अशा प्रकारची थोडी धूर्त बुद्धि ही दे रे रामा..!!
समर्थांना अपेक्षित एक पूर्णपुरुष,पूर्णमानव आहे.जो बहुआयामी आहे पण स्वतःशी प्रामाणिक आहे.सकृत आहे..!असा पुरुष बनणं हे त्यांच स्वप्न आहे..अशा अनेक पुरुष,स्त्रियांनी हा समाज परिपूर्ण असावा हा समर्थांचा ध्यास आहे..!!
श्रीराम..!
प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment