*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ६*
*भाग १*
*रामा तुझ्या स्वामीपणे*
*मानी ब्रम्हांड ठेंगणे..|*
*तुजवीण कोण जाणे..*
*अंतर हे आमुचे..||१||*
*तुजवीण मज माया..*
*नाही नाही रामराया..|*
*आम्हाअनाथा कासया.*
*उपेक्षिसी..||२||*
समर्थ म्हणतात...
रघुराजा तू माझा सर्वकाही आहेस.माझं जीवित्व,माझं व्यक्तित्व,सारे व्यवहार हे तुझ्या आधिपत्याखाली आहेत.तू नियंता आहेस.तू त्राता आणि तूच निवारा आहेस.
समर्थ म्हणतात..
रघुराजा तू माझा स्वामी म्हणजे मी तुझा दास आहे.आणि हे दास्यत्व इतकं विलोभनीय आहे की सर्व सुखाच शिखर स्वर्ग सुख आणि ब्रम्हांड मालकीचं सुख हे खूपच कोत वाटत.अपूर्ण वाटत.हे दास्यत्व म्हणजे सुख,दुःख याच्या पलीकडचा परमानंद म्हणजे हे दास्य सुख आहे.
समर्थ म्हणतात..
रघुराजा..तुझ्याविना कोणत्याही आनंदच मायाजाल हे ठेंगण च आहे.तुझी भक्ती,तुझं पूजन,तुझं नामस्मरण हे सारं या भौतिक मायेच्या पलीकडच मायासुख आहे.आणि माया सुद्धा परब्रम्ह माया असल्याने अलौकिक आणि अतुलनीय आहे.यापेक्षा कोणतीही सुख माया असू शकत नाही.
समर्थ म्हणतात..
रघुराजा..ही तुझी माया,तुझं स्वामित्व मला मान्य आहे.मग परमार्थ मार्गात असे अनाथ अवस्थेत आम्ही का आहोत.?तू आम्हाला अजून पोरकं का ठेवलं आहेस..?का आम्ही असे तुझ्या पूर्ण स्वामीत्वा पासून वेगळे आहोत.?
समर्थ रामकृपा आणि त्याची सावली यांची तुलना शाररिक,मानसिक,सामाजिक मायेसी करतात.आणि त्यात निर्णय देतात की रामाच्या स्वामीपणा पेक्षा या सगळ्या भौतिकतेची किंमत शून्य आहे.त्याचा आयुष्याला काहीही उपयोग नाही.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment