*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ५*
*भाग २*
*वेदशास्त्री अर्थ शोधोनी पाहिला..|*
*त्याही निर्धारिला भक्तिभाव..||३||*
*रामी रामदासी भक्तीच मानली..|*
*मने वस्ती केली रामपायी..||४||*
समर्थ म्हणतात..
वेद, उपनिषदे,पुराणे ही सगळी अशा निस्सीम भक्तीचे स्रोत आहेत,ज्यात त्या निर्गुण अशा परमेश्वराची स्तुती आणि सगुणाच पूजन याच वर्णन आहे.आणि या दोन्हीच मूळ ही पराकोटीची भक्तीच आहे.
समर्थ म्हणतात...
अनेक ऋषी,मुनींनी या साऱ्या धर्मसहित्यात भक्तीचे अनेक दाखले,त्याचे त्या त्या काळातील मंत्र,ऋचा यातून होणारे सकृत परिणाम याचीच महती गायलेली आहे.
समर्थ म्हणतात..
आम्ही रामदास झालो हा या भक्तीचाच परिणाम आहे.जी भक्ती वर्षानुवर्षे आमच्या कुळात आहे.जी भक्ती या रामादी अवतारांनी त्या त्या अवतारकाळात अजून बळकट आहे हे या पृथ्वीवर अवतार घेऊन सिद्ध केलं आहे.
समर्थ म्हणतात..
आता ही राममय भक्ती इतकी आयुष्यच एक भाग बनून गेली आहे की तिने मनातील प्रत्येक इच्छेचा ताबा घेतला आहे.या भक्तीचा आधार हा रामचरणाशी एकरूप होईपर्यंत असेल इतकी ती मनात सुदृढ झाली आहे.
समर्थ निस्सीम भक्तीचा आदर्श घालून देतायत.भक्तीचे अध्यात्मातील स्थान,परमार्थामध्ये योग्य अशी वाटचाल ही भक्ती आचरून हे आयुष्य सफल आणि सुनंदन करून देते अस समर्थ सांगतात.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment