समर्थांची करुणाष्टके (५) कडवे चौदावे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे चौदावे...

समर्थ म्हणतात...

उदास वाटते जीवी...
आता जावे कुणीकडे..
तू भक्तवत्सला रामा...
बुद्धि दे रघुनायका...!

रामराया.. आता अशी वेळ आलीये..की तुला पाहिलं नाही,तुझ्या समीप आलो नाही..उपासना केली नाही..अस जर झालं तर मला चुकल्या सारख वाटत.मला उदास झाल्यासारखं वाटत..त्यामुळे कुठं जावं,काय करावं म्हणजे मला समाधान मिळेल हे कळत नाही..
रामराया..तू  वात्सल्यरुप  म्हणजे मला साथ देणारा,मन राखणारा,माझी काळजी घेणारा असा तू आहेस..!
रामराया.. आता फक्त मला तू तुझ्याशी एकरूप व्हायची  बुद्धी मला दे म्हणजे मला हा परमार्थ साधता येईल.आणि माझं सार्थक होईल..!

श्रीराम..!

प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment