समर्थांची करुणाष्टके (५) कडवे तेरावे..

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे तेरावे..

समर्थ म्हणतात..

पीशुणे वाटती सर्वे..
कोणीही मजला नसे..
समर्था तू दयासिंधू..
बुद्धि दे रघुनायका..!

रामराया..एकदा तुझ्याकडे मुख करून बसलो की पूर्ण समाज माझ्या पाठीशी जातो..मी या समाजाप्रती विन्मुखता स्वीकारतो.आणि मला माहिती आहे की तुझ्याकडे यायचं असेल तर  भौतिक,ऐहिक आयुष्याकडे पाठ करायलाच हवी.आणि मग सहाजिक मला तुझ्यासमोर सगळे परके वाटतात..!तुझ्याशिवाय माझ्याजवळच अस कोणीच रहात नाही.तूच कर्ता, तूच करविता.याची मला मनोमन खात्री आहे.सर्वशक्तिमान असा तू आहेस. रामा..माझ्यासारख्या अजाण भक्तासाठी तू पूर्ण दयावंत आहेस..फक्त मला तुझी ही दया, कृपा ओळखायची बुद्धि तू मला दे..म्हणजे रघुनायका आयुष्याच सार्थक होईल..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment