समर्थांची करुणाष्टके (७) कडवे पाहिले.

समर्थांची करुणाष्टके (७)

कडवे पाहिले.

समर्थ म्हणतात...

उदासीन हा काळ जातो गमेना..
सदा सर्वदा थोर चिंता शमेना..
उठे मानसी सर्व सांडूनि जावे...
रघुनायका काय कैसे करावे..?

रामराया..आयुष्य खर म्हणजे तुला वाहिलेल.पण तुझ्याच भक्तीत,उपासनेत राहूनही मी तुझ्या समीप,एकरूप होऊ शकत नाहीये त्यामुळे आयुष्य निरस वाटू लागलंय आणि जगणं ही..!

रामराया..माझी उपासना ही व्यवस्थित मार्गावर आहे की नाही.तुझी कृपा होईल इतपत फलद्रुप होईल की नाही..?माझ्या हातून पारमार्थिक प्रमाद घडत नाही ना?अशा अनेक चिंता मनात उत्पन्न होतायत..आणि त्याचा परिहार होत नाहीये..!

रामराया..अशा वेळी उद्वेगाने,अनेकवेळा वाटत की हे सगळे प्रयत्न सोडून द्यावे..विदेही व्हावं,अज्ञात स्थळी गमन करावं.जिथे कोणताही संपर्क नको.विजनवास स्वीकारावा..!

रामराया..सांग बर..तुझ्याशिवाय मी कुणाकडे सल्ला मागणार नाही..तूच माझ्या आयुष्याचा कर्ताकरविता आहेस.मग तूच मला समजाव..!

समर्थ उपासना मार्गातला,  मानवी जीवनाचा अजून एक भाव उलगडून सांगतात.उद्वेग.जगणं नकोस होणं.ही अवस्था अर्थात रामरायाप्रति असलेल्या ओढीची अंतिम परिणीती आहे हे नक्की.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment