समर्थांच साहित्यविश्व (भूपाळी) (भाग१)

*समर्थांच साहित्यविश्व..*
*भूपाळी*

*भाग १*

*राम आकाशी पाताळी.*
*राम नांदे भूमंडळी...*
*राम योगीयांचे मेळी...*
*सर्वकाळ तिष्ठत...!*

समर्थ म्हणतात..

आकाशाची व्याप्ती आणि भूमीची खोली..ही रामाने व्यापून आहे.हा राम म्हणजे या दोन्ही ठिकाणी सापडणार अमूर्त चैतन्य.जी आकाशाची निळाई तोच रामरायाचा वर्ण..आणि जी भूमीची सकसता ते रघुराजाचे आशीर्वादात्मक कर्म..!

समर्थ म्हणतात...

रामराय जरी विष्णूचा अवतार,स्वर्गस्थ देवतांचा अंश..पण त्याचा निवास मात्र या भूमीतलावरचे  अचल,चल चराचर आहे.राम इथेच नांदतो.आणि समरसतो.

समर्थ म्हणतात..

रामतत्व जरी मूळ ओंकाराचा आविष्कार असले तरी योगी,तापसी,तपस्वी हे सारे त्यांच्या योगलीलात रामच धारण करतात.असा योगीयांचा,संतांचा समूह म्हणजे रामाच समाजाभिमुख दर्शनच आहे..!

समर्थ म्हणतात...

ज्याच एखाद्यावर प्रेम असत ती व्यक्ती आपल्या प्रियजनासाठी,आराध्यासाठी सदासर्वकाळ वाट बघत असते.रामराय पण तसेच.योगी,संत,महंत, भक्त यासगळ्यासाठी  मनापासून तिष्ठत रहाणं हे जरी त्यांचं इप्सित असलं तरी अस होणं रामकृपाच आहे..!


श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment