*समर्थांचे साहित्यविश्व..*
*भूपाळी*
*भाग ३*
*राम भावे ठायी पडे..*
*राम भक्तीशी आतुडे..*
*राम ऐक्यरूपी जोडे..*
*मौन पडे श्रुतीसी..!*
समर्थ म्हणतात..
रघुराज हा भावाचा भुकेला आहे.कोणताही अन्न,वस्त्रदीक अर्पणापेक्षा तो भावार्पण जिथे आहे तिथे लवकर प्रसन्न होतो असा अनुभव आहे.
ह्या रघुराजाला बोलावण्याचा,त्याच्याशी अनुसंधान बांधायचा,आपल्या भोवती सदा कृपामयी ठेवायचा एकच मार्ग आहे..तो म्हणजे अपरिमित भक्ती,अतुल्य भक्ती.
समर्थ म्हणतात..
हा रघुराज एकसंध,समूहाचा स्फुरणदाता आहे.जिथे भक्तीयुक्त ऐक्यता आहे,जिथे शक्तीयुक्त भक्तांचा गजर आहे तिथे हा रघुराज कायम तिष्ठत असतो.
समर्थ म्हणतात..
रघुराजाच गुणानुवर्णन,शक्तीच संकीर्तन करायला लागलो की वेद,पुराणांची महती,आणि त्यांची भव्यता ही कमी वाटते.वेदातले मंत्र,ओव्या ही खूपच अपुऱ्या शब्दांच्या वाटतात.
असा हा एकमेव रघुराज..!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment