समर्थांचे साहित्यविश्व (अभंग १) (भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग १*

*भाग २*

*म्हणोनी आमुचे कुळी कुलदैवत |*
*राम हनुमंत आत्मरूपी ||३||*

*आत्मरूपी झाला रामी रामदास.|*
*केला उपदेश दिनोद्धार..||४||*

समर्थ म्हणतात...

आमुच्या कुळात कुलदैवत म्हणून रामराय अवतरले.आणि त्याबरोबर  हनुमंतराय ही.पण हे दोघेही केवळ सगुण रूपातच पूजन करण्यासाठी आमचे कुळी राहिले नाहीत तर आम्हा  प्रत्येकाच्या मनात निर्गुण स्वरूपात आत्मरूप होऊन राहिले आहेत.संपूर्ण कुळच राम झालं आहे.

समर्थ म्हणतात..

या साऱ्या रामकृपेचा परमोच्च बिंदू म्हणजे माझ्यासारख्या या दासाचा रामरायांनी रामदास करून घेतला आहे.रामरायांनी त्यांच्या आत्मस्वरूपाची ज्योत माझ्या हृदयी चेतवली आहे.आणि या आत्मतत्वाने असा काही आमूलाग्र बदल घडवला आहे की या दिनाचा रामदास होऊन गेला आहे.

समर्थ रामकृपेची परिणीती किती उद्बोधक होते याच वर्णन स्वतःच्या राममय अवस्थेवरून सांगतायत.या अभंगात रामाची कृपा असेल तर दिनाचा रामदास कसा होऊ शकतो याच वर्णन समर्थांनी केलं आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment