*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ७*
*भाग २*
*जन्मभरी धरिले तुज हृदयी ..|*
*आता या समयी पावे बा..||३||*
*निष्काम ती तुज सेवायाची आशा..|*
*अंती रामदासा सांभाळावे..||४||*
समर्थ म्हणतात..
रघुराजा...आयुष्यभर तुझे पूजन,तुझी उपासना,तुझा नामजप याशिवाय आम्ही वेगळं काय केलंय रे..?तुझी उपासना,दर्शन म्हणजे आमचा निजध्यास..!तुला हृदयापासून आळवले आहे.तुझे संकीर्तन केले आहे..!
समर्थ म्हणतात...
रघुराजा..या संकीर्तनाचे फळ हे तुझे निरंतर धाम आहे हे आम्ही अनेक सत्पुरुषांकडून ऐकले आहे.आणि ते आम्हाला ही मनापासून पटले आहे.आता तुझी कसोटी आहे की या अंतिम क्षणी तू तुझी ही महती खरी करणार ना..?
समर्थ म्हणतात..
तुझं संकीर्तन, पूजन हे निष्काम करायचं हे आम्हाला अनेक ऋषी,महंत आणि ज्ञानी जनांकडून उमजले आहे.आणी तशीच निर्विकल्प,निष्काम उपासना आमच्याकडून घडावी असा आम्ही प्रयत्न ही केला आहे.
समर्थ म्हणतात..
हे सगळं यासाठी की आयुष्याच्या शेवटच्या क्षणी श्वासांचे स्मरण विसरेल त्यावेळी तुझ्या सस्वरूपात स्थान मिळेल.तू दास म्हणून आमचा सदेह स्वीकार करशील..!आणि या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून वाचवून तुझ्या धामी आम्हाला कायमचा आश्रय देशील..!हो ना रामराया..?
समर्थ निष्काम उपासनेचे अंतिम सकाम फलित इथे समजावत आहेत.तसेच दास्य भक्ती ची परिणीती सख्य भक्तीत कशी होते याचेही विवरण ते या अभंगात प्रस्तुत करत आहेत..!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment