समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ८) (भाग १)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ८*

*भाग १*

*तोवरी तोवरी डगमगिना कदा..|*
*देहाची आपदा झाली नाही.||१||*

*तोवरी तोवरी परमार्थ स्वयंभु..|*
*जव पोटी लोभ आला नाही..||२||*

समर्थ म्हणतात..

मनुष्य तोपर्यंत शूर असतो.आपमग्न असतो.स्वतःच्या गुणगान करण्यात मश्गुल असतो.स्वतःची प्रौढी,योग्यता,आर्थिक स्थिती सांगण्यात पुढे असतो..!

जोपर्यंत देहाला कोणताही त्रास होत नाही.जोपर्यंत स्वतःला मानसिक तोशीस लागत नाही.वार्धक्याची चाहूल लागत नाही.स्वतःच प्राकृत बिघडत नाही..!

समर्थ म्हणतात..

तोपर्यंत आपला संसार,आपले नाते संबंध,आपले गणगोत,आपले सुखासीन जीवन याबाबतीत अतिशय अभिमानी असतो.

जोपर्यंत त्याच्यासमोर कुठल तरी वैभव की जे त्याच्यापेक्षा ही मोहक,उठावदार आणि लोभ होऊ शकेल अस समोर येत  नाही.अशा मनुष्याच स्वमग्नता ही डळमळीत असते.पोकळ असते.

समर्थ मनुष्याच्या नेमक्या स्वभावाच्या वर्मावर बोट ठेवतात.मनुष्याला देव,धर्म,कृपा यांची तेंव्हाच आठवण येते.जेंव्हा तो अस्वस्थ होतो.जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत तो स्वतःच्या कर्तृत्वात अभिमानी रहातो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment