समर्थरचित चौपदी (भाग २)

*समर्थरचित चौपदी..*
*भाग २*

*हितकारक दे रे राम..*
*जनसुखकारक दे रे राम*
*अंतरपारखी दे रे राम..*
*बहुजनमैत्री दे रे राम..!*

समर्थ म्हणतात..

रामराया.. जे आयुष्याच खर सुख आहे ते सुख मला दे.ते हिताचे असेल ते दे.हव्यास आणि अप्पलपोटे पणा याचा स्पर्श नसलेल...विचार आणि अस्तित्व शुद्ध आणि सात्विक करणार हितकारक मला दे रे रामराया..!

रामराया..मी या प्रचंड आणि सर्वव्यापी समाजपुरुषाचा एक भाग आहे.माझ्या बरोबरच या समाजात रहाणारा प्रत्येक मनुष्य सुखी राहील अस  सुलभ रहाणीमान तू सभोवती निर्माण कर.म्हणजे माझ्या पूर्ण मनुष्यजातीला  कल्याण,सुख मिळेल.समृद्धी मिळेल.

रामराया..मला बहुश्रुत व्हायचं असेल मला मला समोरच्याच्या भावनांचा, मनाचा अंदाज घेण्याची अचूक कला आली पाहिजे.मला त्यांचं मन,त्यांची देहबोली ही कळली पाहिजे.तरच मी समाजाभिमुख होईन.मला हे सामर्थ्य देणारा तूच आहेस ना..?

रामराया..मला सख्यत्व ही पाहिजे.मला समाजातील प्रत्येक घटकांशी नाळ जोडता आली पाहिजे.वर्णरहीत,भेदरहित असा मैत्र परिवार हे उन्नत मनाच लक्षण आहे.सभोवती सहृद अशा घटकांचा वावर असणे हे उत्तम लक्षण आहे.अशी बहुजन मैत्री मला दे..!

समर्थ हे एक द्रष्टे संत  होते.त्यांना एक आदर्श असा समाज निर्माण करायचा आहे.ते त्याच्यासाठी रात्रंदिवस कार्यरत होते.त्या समाजासाठी समर्थ हे रामाकडे मागत आहेत..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment