समर्थरचित चौपदी (भाग ३)

*समर्थरचित चौपदी..*
*भाग ३*

*विद्यावैभव दे रे राम..*
*उदासीनता दे रे राम..*
*मागो नेणें दे रे राम..*
*मज न कळे ते दे रे राम.*
*तुझी आवडी दे रे राम..*
*दास म्हणे मज दे रे राम.*

समर्थ म्हणतात..

रामराया..मला प्रगल्भ बुद्धि आणि व्यासंग वाढावा म्हणून साक्षरता,अर्थता आणि मनाच्या शुद्धतेसाठी या सगळ्याचा उत्तम अर्क असलेली विद्या आणि त्याबरोबर येणार बुद्धिप्रामाण्यवादाच वैभव हे दोन्ही अपेक्षित आहे..!ते माझ्या वंद्य आणि श्रेष्ठ लोकांकडून मला प्राप्त होऊ दे रे रामा..!

रामराया..मला औदासिन्य ही अपेक्षित आहे.कुठल्याही प्रतिक्रियेवर लगेच उत्तर देण्याची गडबड ही चुकीची असते. त्यासाठी त्या घटनेकडे,कारणाकडे त्रयस्थ अशा नीरामय वृत्तीने बघण्याची सवय जडावी.हे सकारात्मक औदासिन्य मला दे रे रामा..!!

रामराया..मला न कळणाऱ्या किंव्हा काय मागायचे असते हे ही समजत नसलेल्या अनेक गोष्टी आहेत.ज्यातून माझा उत्कर्ष होऊ शकतो.पण माझ्या सारख्या तुझ्या भक्तासाठी काय चांगले आहे हे तुला मात्र माहीत आहे.ते मला दे रे रामा..!!

रामराया..माझ्या भाळी लिहिलेल्या अनेक हिताच्या गोष्टी आहेत ज्या मला माहित नाहीत.काहीवेळा माझ्या मुढतेमुळे,माझ्या आढयतेमुळे मला त्या कळत ही नाहीत.त्या साऱ्या गोष्टी अवगत करून दे रे रामा..!!

रामराया.. मला या साऱ्या जगात तूच प्रिय आहेस.आणि तूच माझं अंतिम ध्येय आहेस.त्यासाठी अहर्निश अशी तुझी मानसिक,वाचिक भक्ती करण्यासाठी इतर प्रलोभन कमी करून तुझी आवड मला प्राप्त होऊ देत रे रामा..!

रामराया..तुझा मी अंकित आहे.तुला शरण आहे.तुझा चरणरज आहे.या नात्याने मी तुझ्याकडे हे मागण सदोदित मागतोय.मला पारमार्थिक अस सार दे जे मला तुझ्या धामापर्यंत मला घेऊन येईल..!!

समर्थ विचार करतात तो प्रत्येक विचार रामर्पणमस्तू या वृत्तीचा असतो.शहाणपण,बुद्धि हे सारं रामापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची पराकाष्ठा आहे.आणि तेच मागण समर्थांच रघुराजाकडे आहे..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment