*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*स्मरण स्मररिपूचे विषहर्ते वपूचे.|*
*निजविज निगमाचे सार सर्वागमांचे.|*
*मन त्रिभुवनाचे गुज योगीजनाचे..|*
*जिवन जड जीवांचे नाम या राघवाचे..||*
समर्थ म्हणतात...
षड्रिपूच्या संगाने मनात,शरीरात जो विषरूपी संसर्ग होतो.मन कलुषित होते.शरीर हे वासनासंगाने कुष्ठ होते.अतृप्तीमुळे डहूळले जाते.हे सारे रामवृत्ती आणि रामनामाने सज्जनसंगी होते.शुद्ध होते.
समर्थ म्हणतात..
हे रामरायांचे स्वरूप,दर्शन हे पुराणकथाचे फळ आणि वेद,वेदांगाचे स्वरूप आहे.आणि हेच स्वरूप कुठल्याही सज्जनमनात ही असते.कारण ते शुद्ध आहे.सत्व आहे.
समर्थ म्हणतात..
तिन्ही लोकांचा चांगुलपणा असलेलं हे मन ल्यायलेले हे मनुष्य अनेक संत,महंत, तापसी यांच्या वचना प्रमाणे आयुष्य काढत असतात.स्वतःही तृप्त,आनंदी असतात..आणि सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला ही तसच करतात..!
समर्थ म्हणतात..
अशा मनुष्याचे सर्व कर्तव्य आणि गुण लाभलेले आणि जगत असलेल्या प्रत्येकाचे स्थिर असे ठिकाण,लिन होण्याचे ठिकाण, विश्रांतीस्थळ हे फक्त रामनाम आहे.आणि ते जपून आयुष्य सफल करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
समर्थ रामराया आणि समाजातील सत्वगुणी माणसे याची सांगड घालून त्यांच्यातला राम आपल्यापुढे उलगडून सांगतात.त्याची लक्षणे आणि सुखांकीत अस्तित्व आपल्यापुढे प्रदर्शित करतात.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment