*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*हरीजनभजनाचा होय साक्षी मनाचा..|*
*सकलत्रिभुवनाचा प्राण साधुजनांचा.|*
*परि हरिभजनाचा आखिलासे दिनाचा.|*
*घननिळ गगनाचा रंग सर्वोत्तमाचा..||*
समर्थ म्हणतात...
हा रामराया त्याच्या संकीर्तनाच्या ठिकाणी असतो.जिथे रामनाम तिथे राम.तो आपण करत असलेल्या प्रत्येक कृती,हालचालींचा एकमेव साक्षीदार ही आहे.की ज्याच्या आधारे ते कार्य सत्वगुणी करायला हुरूप येतो.
समर्थ म्हणतात..
हा राम,त्याचा सत्वगुण तिन्ही लोकात जो चांगुलपणा आहे त्यात रममाण आहे.आणि हा सत्वगुण अनेक साधू,सज्जन,संतांच जगण्याच साध्य आहे.अर्थात राम या साऱ्याच्या आयुष्यातील जिवंतपण आहे.
समर्थ म्हणतात...
तो रामराय हरिभजनी असलेल्या दासांचा अखिल असा सर्वसंगी आहे.तो त्यांच्या मनात कायम विराजित असा देववास आहे.त्या सत्वगुणी मनुष्यातील उर्वरित दैन्याचा परिहार आहे.
समर्थ म्हणतात..
निळ रंग हा मनाला आराम देणारा..तृप्त करणारा.जो रंग आकाश मुळरूपात पांघरते.असा रंग रामरायांच्या तनु चा ही आहे.त्यामुळे आकाशासरखी छाया म्हणजे सर्वोत्तम असा रामराय..!
समर्थ सत्वगुणी राम आणि सत्वगुणी मनुष्यातील सत्य,सुंदरतेचा आविष्कार वर्णन करून सांगतात.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment