*समर्थांचे साहित्यविश्व*
*करुणास्रोत्रे संकीर्ण*
🌺
*चतुरपण जनी हे पाहता आढळेना.|*
*निकट रघुविराचे रूप कैसे कळेना.|*
*चपळमन वळेना गर्वताठा गळेना..|*
*तुजवीण जगदीशा कर्मरेखा टळेना..||*
समर्थ म्हणतात..
मनुष्याकडे जी उपजत भक्तबुद्धी यायला पाहिजे ती बुद्धि माझ्याकडे नाहीये.ते शहाणपण मला माझ्या आयुष्यात आत्मसात करता येत नाहीये.
समर्थ म्हणतात..
सदा सर्वदा कायम माझा सखा,सोबती,चालक,मालक असलेला रामराय इतका जवळ असून ही त्याचे पूर्ण,खरे निर्गुण रूप अजूनही आम्हाला कळत नाहीये..!
समर्थ म्हणतात...
हा रामराया मला पूर्ण कळावा अशी माझीही इच्छा आहे.पण मनाचा चंचलपणा आणि मनातला मी पणाचा गर्व हा कायम रामरायांच्या सख्यतेच्या आड येतोय.
समर्थ म्हणतात...
जोपर्यंत हा जगनियंता मला मिळत नाही..त्याचे सुस्वरूप कळत नाही.जोपर्यंत तो आणि मी वेगळे राहू,आम्ही एकसंग होत नाही तोपर्यंत माझे कर्मभोग माझी पाठ सोडणार नाहीत.मला त्याच चक्रात पुन्हा पुन्हा फिरावं लागेल.
समर्थ रघुवीराचे,परमेश्वराचे स्वतःच्या आणि समस्त मानवांच्या आयुष्यातील स्थानाचे महत्व विशद करून सांगतात.आणि जोपर्यंत त्याची कृपा,त्याची साथ मिळत नाही तोपर्यंत आपली विवशता ही ते सढळ मान्य करतात.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment