*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे.*
🌺
*पळपळ चळताहे बाळ तारुण्य देही.|*
*तळमळ विषयांची नेणवे हीत काही.|*
*लळलळ गरळा तो काळ लाळीत आहे..|*
*जळजळ शितळा हे भक्तीसेऊनी राहे..||*
समर्थ म्हणतात ..
क्षणाक्षणाने वाढणारे बालक जेंव्हा तरुण होते.देहात उर्मी,चेतना,बळ हे साठू लागते.त्याचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व त्याला आणि समाजाला प्रतीत होऊ लागते.प्रारब्ध आणि संचित याचा योग्य मेळ घालायची ही वेळ म्हणजे क्षणाक्षणाने तयार होणारे तरुणपण.
समर्थ म्हणतात...
या तारुण्यात सगळ्याबरोबर अजून एक भावना वाढते ती म्हणजे विषयवासना.ही विषयवासना तारुण्यसुलभ नक्कीच आहे.पण त्याने भविष्यकालीन आयुष्याचे हीत नक्कीच होत नाही.आणि हे हित होत नाहीये हे तारुण्याच्या उर्मीत जाणवत नाही.
समर्थ म्हणतात..
काळ नावाचा एक विषसर्प आयुष्यातले क्षण या विषयसुखाच्या साथीने मनुष्याचा सत्वधर्म,निश्चलता कुश्चीळ करत असतो,विषारी करत असतो.
समर्थ म्हणतात...
ही काळाने विषयसुखाच्या साथीने निर्माण केलेली स्वार्थी गरळ, तिचा पुण्यक्षयी,आयुष्यघातकी प्रभाव कमी करायचा असेल,नष्ट करायचा असेल तर भक्ती नावाचे अमृत आपण ग्रहण आणि मनात साठवायला शिकल पाहिजे..!हीच भक्ती या कळीकाळ निर्मित हे हलाहल निववू शकते,शांत करू शकते.
समर्थ आयुष्याचा सुवर्णकाळ म्हणजे तारुण्य.या काळात निर्माण होणाऱ्या,मतीक्षय,पुण्यक्षय करणाऱ्या विषयसुखाच्या सुंदर पण प्रारब्धाच्या दृष्टीने काहीवेळा घातकी ठरणाऱ्या संकटाची जाणीव आपल्याला करून देत आहेत.आणि त्यावर उत्तम उपाय म्हणून भक्ती,उपासनेचा उपचार ही आपल्याला सांगत आहेत.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment