*समर्थांचे साहित्यविश्व.*
*अपरिचित करुणास्रोत्रे.*
🌺
*दिनकरकुळवल्ली लोटली अंगभारे..|*
*रघुविरअवतारे दाटली थोरथोरे..|*
*सुखरूप सुखवासी राहिले योगरासीं.|*
*सफळ सितळ छाया फावली रामदासी..||*
समर्थ म्हणतात...
सूर्यवंश हा अपरिमित सुख देणारा वंश.सामाजिक,मानसिक,भावनिक,पारमार्थिक असा प्रत्येक पातळीवर सुख देणारा हा वंश.. जो पृथ्वी सुजलाम,सफलाम करतो..!
ब्रम्हांडापर्यंत हा वंशवेल विस्तारला आहे.(अर्थात सारे त्याचेच वंशज आहेत.)
समर्थ म्हणतात..
रघुराजासारखे नरपुंगवी अवतार..अनेक शक्तीयुक्त अवतार... म्हणजे चक्रवर्ती राजे..!अनेक भक्तीयुक्त अवतार..म्हणजे संत..!या सुर्यवंशाचे देणे आहेत.
समर्थ म्हणतात..
जे जे मनुष्य,प्राणी या वंशाच्या आसऱ्याला गेले. त्याच्या अस्तित्वामुळे वाढले.फुलले.सारे सुखवंत होऊन गेले.
समर्थ म्हणतात..
तेच सुख...!!!आम्ही मिळवलं आहे..!त्यासाठी आम्ही आमची उपासना करून सुर्यवंशातील अवतारीत नरोत्तमाना अर्पण केली आहे.अर्थात त्या छायेखाली आम्ही रामदास कृतार्थ झालो आहोत.
समर्थ सुर्यवंशाचे महिमामंडण करत आहेत.रघुराजाचा हा वंश किती विस्तारला आहे.युगानूयुगे हा सूर्यवंश सृष्टीचे कल्याणच करत आला आहे.आम्हीही रामदासी होऊन त्यांच वंशाच्या छत्रछायेखाली स्वतःचे आयुष्य कारणी लावले आहे.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment