*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*लघुलाघवी राम कोदंडधारी..|*
*मनी चिंतिता शोक संताप हारी..|*
*महा संकटे नाम घेता निवारी..|*
*भवसागरी मूढ पाषाणतारी..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
अत्यंत दृष्टीला ला प्रिय आणि लोभस असा हा रामराय.. जो त्याच्या आशिर्वचनी नजरेमुळे अत्यंत जवळचा वाटतो तसा हाती धरलेल्या कोदंड धनुष्यामुळे त्याच रणधीर स्वरूप ही अत्यंत कर्तृत्वशाली वाटत.
समर्थ रामदास म्हणतात..
अशा रघुराजाच चिंतन केलं की शोकरूपी विकल्प,संतापरुपी विघ्न लयाला जाऊन मनात केवळ सात्विकतेचा वास सुरू होतो.या सात्विकतेमुळे वाईट असे जे काही सभोवती असेल त्याचा नाश होतो.
समर्थ रामदास म्हणतात..
घनघोर संकटे,विषमकाळाचे राक्षस हे या रामराया चे नुसतं नाम घेतलं तरी भक्तांपासून दूर होतात.तो रघुराज त्या सगळ्यांच निरसन केवळ दृष्टीफेक करून टाकतो.
समर्थ रामदास म्हणतात..
भवसागरातल्या प्रत्येक अडकलेल्या मुमुक्षुला, शिळारुप अशा मूढ वृत्तीला हे रामनाम सुखपुर्ती मिळवून देते.साफल्याचा किनारा मिळवून देते.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment