समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*चकोरासी चंद्रोदयी सुख जैसे..|*
*रघुनायका देखता सुख तैसे..|*
*सगुणासी लाचावले स्थिर राहे..|*
*रघुनंदनेवीण काही न पाहे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात...

चंद्रोदयाच सुख सर्वात जास्त चकोर पक्षाला असते कारण चंद्रकिरणे ही त्या चकोराची खरी भूक असते. गरज असते.ज्याने तो अंतर्यामी केवळ आनंदसागर अनुभवत असतो.

समर्थ रामदास म्हणतात..

असेच अमाप सुख मला होते जेंव्हा मी रामरायांचे मुखदर्शन घेतो.तो कृपासागर राम आपल्या मनात एकरूपतेचा,स्नेहल आशीर्वादाचा अवघा मेघ रिता करतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या सगुण दर्शनाला हे मन अतिशय अधीर आहे.केवळ त्यासाठी अतिशय लालची होऊ पाहतय.आणि ही भक्तीची लालूच दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हा रामरायांच्या सगुण भक्तीचा नाद आता इतका मधुर वाटू लागला आहे की त्याशिवाय हे मन कुठेही स्थिर होत नाहीये.कुठेही रुळत नाहीये.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment