समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*लवे नेत्रपाते स्फुरे आजि बाहे..|*
*दीनानाथ हा राम येणार आहे..|*
*जयाचेनि योगे सुखानंद लोटे..|*
*तया देखता अंतरी बाष्प दाटे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

डोळ्यांची पापणी लवते आहे.हा शुभसंकेत आहे.हे शुभवर्तमान येणारा काळ घेऊन येणार आहे.अचानक केवळ जाणिवेने बाहुत,गात्रात स्फुरण चढून ते हर्षोउन्मादीत होत चालले आहेत..!

समर्थ रामदास म्हणतात...

तो राम जो सर्वउद्गारक,सर्वतारक सर्वकृपाळू आहे,त्याच आगमन आता निश्चित आहे.हे या साऱ्या शुभशकुन आणि शुभचिंतनाने खर ठरत आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

तो रामराय आला की सौख्याचे सोहळे सुरू होतात.सगुणरूपाचे संकीर्तन चालू होते.भक्तीसागरातून आनंदसागराचा प्रवास सुरु होतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या रघुराजाचे केवळ मुख दर्शन घेतले की डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात.मन,हृदय भक्तीने उचळंबून येते.आणि अधीर होऊन स्निग्ध,मुलायम होऊन जाते.

चाफळला रामपंचायतानाची प्रतिष्ठापना होणार होती त्या आसपास समर्थानी लिहिलेलं काव्य.रामाच आगमन समर्थांना किती मुग्ध करत होत,याचा प्रत्यय आपल्याला या ओवीत दिसतो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment