समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*शमशम विषयांची काही केल्या शमेना..|*
*अचपळ मन माझे साजणी हे दमेना..|*
*अनुदिन मज पोटी दुःख तेही वमेना..|*
*तुजविण जगदीशा वेळ तोही गमेना..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

विषयांची प्रदीर्घ वखवख ही आयुष्याला पुरून उरत चालली आहे.त्या विषयांचा  अंत हा दृष्टिला कुठेही दिसत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

या विषयांच्या कर्दमात मन अडकून राहू लागल आहे.आणि ते इतक्या वेळा गुंतून ही त्यातून अलग होत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

या सगळ्याची परिणीती मन अतिशय मनात वैषम्याची स्थिती निर्माण होत असली तरी त्याचे निरसन मी करू शकत नाहीये.ते दुःख त्याग करू शकत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

हे सगळं आहे पण तुझ्या अस्तित्वाशिवाय मला कोठेही मन रमवता येत नाहीये.त्यामुळे परम सुखाची परमार्थाची प्राप्ती ही होत नाहीये.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment