*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*विषम गति मनाची ते मला आवरेना..|*
*शरीर विकळ कामे ते कदा सावरेना..|*
*सुख दुःख मज माझे वाढिले तेची जेऊ..|*
*रघुपती.!तुजला रे कासया बोल ठेऊ..?||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
मनाने खर म्हणजे जन्म मरणाच्या मुक्ततेते कडे जावे.आपले स्वहित करावे.मनुष्यजन्माचे सार्थक साधून देवचरणी कायमचे गढून जावे.
समर्थ रामदास म्हणतात..
शरीर ऐहिक भावनांच्या अतिरेकाने,त्याच्या विचाराने अतिशय गलितगात्र झालं आहे की जे सावरायचा प्रयत्न केला तरी सावरता येत नाहीये.
समर्थ रामदास म्हणतात..
माझ्या कर्म गतीने मला सुखदुःखाने युक्त असे आयुष्य दिले आहे.ते जगणे,ते व्यतीत करणे हे माझे कर्तव्य आहे.त्याचे फलित आनंद असो किंव्हा विषाद असो.
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया,हे सगळं माझं संचित आहे.माझी कर्मरेखा आहे.माझ्या पूर्वजन्मीचा आणि आजच्या चालू जन्माच्या कर्मानुसार भोग मी स्वतः ओढून घेतले आहेत.त्याबद्दल तुला मी कधीच दोष देत नाहीये..!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment