*नाथषष्ठी*

*नाथषष्ठी*

कैवल्य आणि संसार या दोन्ही विषम अवस्थावर दृढ ठरलेलं व्यक्तिमत्त्व हे नाथमहाराज..!

भक्तक्षेत्रात त्यांना आनंदसगर म्हणतात..!

संत ही सामाजिक प्रवृत्तीच अशी आहे की जे विचार करतात,शब्दात बोलतात आणि तेच आचरणात आणतात..!

केवळ भक्तिमार्ग आणि त्यानुरूप मानसिक शक्ती याचे पुरेपूर उदाहरण असणारे नाथ पैठण क्षेत्रात होते पण सर्व चराचरात उदाहरण म्हणून राहिले.

आपण ना त्यांना फक्त एक कथेतून च ओळखतो..!थुंकणारा यवणाची कथा..!या पलीकडचे नाथ आपल्याला माहीतच नाहीत.

प्रचंड सामाजिक भान,परात्पर भूतदया याचा संयोग म्हणजे नाथमहाराज..!

आणि हे सगळं करताना त्यांची ईश्वरभक्ती तेवढीच प्रबळ आणि एकनिष्ठ..!

नाथवाड्यातल्या मूर्त देव्हारा आणि घरातला *श्रीखंडया* त्यांनी एक मानला..!

नाथमहाराज उत्तम साहित्यिक आहेत.सहित्यातला प्रत्येक प्रकार त्यांनी सामाजिक सुधारणा आणि ईश्वरभक्ती साठी वापरला आणि तो सर्वव्याप्त केला.

समाजसुधारक असून सुद्धा ईश्वराधीन असणं ही सत्शील आदर्श पुरोगामी वृत्ती बाळगलेले नाथमहाराज आजच्या दिवशी कैवल्याधीन झाले..!

कैवल्यउपनिषद प्रत्यक्ष जगणारे असे हे  नाथमहाराज ..!!


©प्रवीण कुलकर्णी🙏

No comments:

Post a Comment