Karunaashtke 2

दुसऱ्या कडव्यात समर्थ म्हणतात...

भजनरहीत रामा सर्वहि जन्म गेला..
स्वजनजनधनाचा वेर्थ म्या स्वार्थ केला.
रघुपती मती माझी आपुलीशी करावी..
सकळ त्यजूनि भावे कास तुझी धरावी..!

काय मजा आहे बघा समर्था सारख अनन्य भक्त ज्यांना रामकृपा,हनुमंतकृपा,दत्तात्रय कृपा दर्शनासहित प्राप्त झालीये ते म्हणतायत की भजनरहित रामा सर्वही जन्म गेला..!
किती अद्भुत आणि विनयशील आहे हे त्यांचं मागण..?
कस असतना..?
आपल्याला संसार असतो,नाती असतात, काळज्या ही असतात..सुख असत,दुःख ही असत..!
असायलाच हव..आपण माणूस आहोत..!!
ह्या सगळ्यातून आपण आपल्याला जमेल,रुचेल,आवडेल तशी भक्ती ही करतो..आणि आपण स्वतःला भक्त म्हणवतो..!
पण समर्थ ज्यांच्या श्वासात राम होता त्यांनी स्वतःवर भजनरहित होण्याचा आरोप का बरं ठेवला असेल..?

आपण ना मनुष्याच्या कृतीत उणेपणा शोधतो..आणि समर्थासारखी द्रष्टी व्यक्ती स्वतःच्या वृत्तीतला नसलेला उणेपणा शोधून तो बोलून रामसमोर शरण जाते..!

हे असे आपण कितीवेळा करतो..?

समर्थ जसे अत्यंत विरक्त वल्ली होती तसेच ते लोकोत्तर संत ही आहेत..!त्यावेळची परिस्थिती ही खूपच विचित्र होती..!यवनांच्या अधिपत्याखाली हे राष्ट्र होते..यातून बाहेर पडण्यासाठी जे जे शक्य होईल ते ते समर्थानी केलं..!अनेक माणस जागी केली,त्यांच्यातली स्वातंत्र्य उर्मी जी मरगळून पडली ती त्यांनी पुन्हा जाजवल्य केली..त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर अखंड तजविजा आणि राजकारण केले..!ही सगळे धकाधकीचे मामले तीक्ष्ण बुद्धीने करत असताना त्यांचा मूळ पिंड जो रामदासाचा होता,रामशरण्याचा होता तो काही निमिष दूर गेला असेल..!
समर्थ त्या काळाविषयी बोलतायत..!या सगळ्यातून रामा या जन्मात मला तुझ्यासाठी खूपच कमी वेळ मिळाला रे..!
आपल्या आणि परक्या माणसांची परीक्षा करत,त्यांची खरी ओळख समाजाला पटवत,अखंड पायपीट या उत्तुंग जीवनात अनेक आपल्यापरकीयांना जवळ ही करावं लागलं..अंतर ही द्यावं लागलं..!रामा तुझा विचार न करता त्यांचा विचार,त्यांच्या बद्दलचे आडाखे करण्यात मी माझा स्वार्थ साधत गेलो..!हे सगळं करता करता कित्येक वेळा मी तुझ्या आस्थेपासून,तुझ्या अस्तित्वापासून दूर गेलो,स्वार्थीपणे वागलो ना रामा मी..?बर त्यात मनुष्य असल्याने पोटाचा,भुकेचा स्वार्थ तरी मला कुठं चुकला?? त्यातही मी फक्त माझा विचार करत गेलो..
मला माहित होतं हे सगळं वेर्थ आहे..तुझ्या अस्तित्वाशिवाय काहीच महत्वाच नाही..!जरी मी केलं नाही तरी माझ्याकडून तू करवून आहेस..तरीही या स्वार्थी पणातून जन्म मी घालवला..!
रामा आता तरी माझी ही बुद्धी बदलून दे..मला आता तरी शिकव की हे सगळं करत असताना तुझ्या केशरी शेल्याच छत्र मी कस धरून ठेवायचं.?किंबहुना हे ही सांग की हे सगळं सोडून तुझं फक्त तुझंच चिंतन कस करता येईल..?

समर्थ हे समर्थ का आहेत हे अशावेळी  कळत..!
आपल्या आयुष्याचा हिशोब ते रामासमोर खुलेपणाने मांडून राहिलेली उणीव जोडण्याची रामसमोर विनंती करतात..!हे आपले समर्थ..!

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment