समर्थांच पहिलं करुणाष्टक
आज तिसरी पायरी..
तिसर कडवं...
विषयजनित सुखे सौख्य होणार नाही..
तुजविण रघुनाथा वोखटे सर्व काही
रविकुळटिळका रे हीत माझे करावे
दुरीत दुरी हरावे सस्वरूपी भरावे..
समर्थ कायमच संन्यस्त जीवन जगले..!विषयसुखाच्या पल्याड असलेला हा अवलिया एकच आसक्ती बाळगून होता ती म्हणजे रामप्राप्ती..!
बर ही निरिच्छता त्यांना वयाच्या बाराव्या वर्षी प्राप्त झाली होती आणि तरीही हा महापुरुष अजूनही म्हणतोय की विषयजनीत सुखे सुख नाही..!निरिच्छतेची अजून एक पायरी..!दर्शनाची अभिलाषा ही सुद्धा एक आशाच..!माझ्यावर कृपा कर हे म्हणणं ही एक स्वार्थ च..!
रामराया तुझं दर्शन गोड नक्कीच आहे..पण तुझ्यात सामावण्या इतकं ते मनोहर नक्कीच नाही..!रामकृपे पेक्षा राममय होणं हे छान..!
म्हणून समर्थ सांगतात की तुझ्यावीण सगळच बेचव आहे..!अगदी तुझी कृपा,तुझा वरदहस्त ही..!
त्यामुळे रामरायाला वाहिलेला हा समर्थ देह त्याचं अंतिम हीत कर अशी प्रार्थना करतोय..!
जो रामराय कृपाळू, कनवाळू,दयाळू आहेच..सौख्यदायी आहेच..
पण तरीही अपेक्षा अशी आहे की त्या रामरायाने ह्या सगळ्यापेक्षा स्वतःच्या सस्वरूप करून हा देह संपवावा..!!
समर्थ रामरूप असून सुद्धा रामस्वरूपा साठी किती आसुसले होते,किती आतुर होते..!
ही आतुरता पाहिजे..!
अंतिम हीत हे कळलं पाहिजे.सुख हे हीत नक्कीच नाही..!
भक्ती असणे आणि ती भक्ती अनुभूतीपर्यंत पोहचवणे याचे रोखठोक मार्ग समर्थानी त्यांच्या साहित्यात अनेक दाखवलेत..!
समर्थानी रामाप्रति असलेल्या अमाप भक्तीच वर्णन ही तितक्याच नेमकेपणे केलं आहे..!
सुख दुःखाच्या पलीकडे असणारी समचरणी अवस्था म्हणजे अंतिम सुख..!
शेवटच्या ओळीत समर्थ रामाचं वर्णन रविकुळटिळका अस करतात..!
रामाचं तेजस्वीपण जस सूर्यकुळाची ओळख आहे तशीच ओळख रामा तुझ्यावरच्या भक्तीने माझी होऊन माझ्यावर विरक्तीच,मुक्तीच तेज दे..!
श्रीराम
©प्रवीण कुलकर्णी
आज तिसरी पायरी..
तिसर कडवं...
विषयजनित सुखे सौख्य होणार नाही..
तुजविण रघुनाथा वोखटे सर्व काही
रविकुळटिळका रे हीत माझे करावे
दुरीत दुरी हरावे सस्वरूपी भरावे..
समर्थ कायमच संन्यस्त जीवन जगले..!विषयसुखाच्या पल्याड असलेला हा अवलिया एकच आसक्ती बाळगून होता ती म्हणजे रामप्राप्ती..!
बर ही निरिच्छता त्यांना वयाच्या बाराव्या वर्षी प्राप्त झाली होती आणि तरीही हा महापुरुष अजूनही म्हणतोय की विषयजनीत सुखे सुख नाही..!निरिच्छतेची अजून एक पायरी..!दर्शनाची अभिलाषा ही सुद्धा एक आशाच..!माझ्यावर कृपा कर हे म्हणणं ही एक स्वार्थ च..!
रामराया तुझं दर्शन गोड नक्कीच आहे..पण तुझ्यात सामावण्या इतकं ते मनोहर नक्कीच नाही..!रामकृपे पेक्षा राममय होणं हे छान..!
म्हणून समर्थ सांगतात की तुझ्यावीण सगळच बेचव आहे..!अगदी तुझी कृपा,तुझा वरदहस्त ही..!
त्यामुळे रामरायाला वाहिलेला हा समर्थ देह त्याचं अंतिम हीत कर अशी प्रार्थना करतोय..!
जो रामराय कृपाळू, कनवाळू,दयाळू आहेच..सौख्यदायी आहेच..
पण तरीही अपेक्षा अशी आहे की त्या रामरायाने ह्या सगळ्यापेक्षा स्वतःच्या सस्वरूप करून हा देह संपवावा..!!
समर्थ रामरूप असून सुद्धा रामस्वरूपा साठी किती आसुसले होते,किती आतुर होते..!
ही आतुरता पाहिजे..!
अंतिम हीत हे कळलं पाहिजे.सुख हे हीत नक्कीच नाही..!
भक्ती असणे आणि ती भक्ती अनुभूतीपर्यंत पोहचवणे याचे रोखठोक मार्ग समर्थानी त्यांच्या साहित्यात अनेक दाखवलेत..!
समर्थानी रामाप्रति असलेल्या अमाप भक्तीच वर्णन ही तितक्याच नेमकेपणे केलं आहे..!
सुख दुःखाच्या पलीकडे असणारी समचरणी अवस्था म्हणजे अंतिम सुख..!
शेवटच्या ओळीत समर्थ रामाचं वर्णन रविकुळटिळका अस करतात..!
रामाचं तेजस्वीपण जस सूर्यकुळाची ओळख आहे तशीच ओळख रामा तुझ्यावरच्या भक्तीने माझी होऊन माझ्यावर विरक्तीच,मुक्तीच तेज दे..!
श्रीराम
©प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment