Karunaashtke 4

समर्थांच करुणाष्टक...
चौथी पायरी..
चौथ कडवं..

समर्थ म्हणतात...

तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे..
तुजविण मज वाटे सर्व संसार ओझे..
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी..
अचल भजनलीला लागली  अस तुझी..

अत्यंत वस्तुस्थितीपुर्ण पण भक्तीयुक्त मागणे..!या जगात जगण्यासाठी, करण्यासाठी जे जे शुद्ध पद्धतीने करावे लागते करताना,ज्याला प्रपंच म्हणतात,हे समर्थ कधीच नाकारत नाहीत.

प्रपंच,गृहस्थाश्रम या सगळ्यात आपलं शरीर,मन,धन याची आवश्यकता असते.यातल्या प्रत्येक गोष्टीला सांभाळावे लागते..!त्यांचे लाड करावे लागतात...त्यांची मर्जी सांभाळावी लागते..!

पण समर्थ हे सगळं करताना या तिन्ही गोष्टी राम च आहेत हे समजतात..!
या शरीरात आत्माराम वसतो..!तो जिवंतपणा ची जाणीव देतो..!या मनात रां या बिजाक्षराच्या रुपात जो राम वसतो तो चैतन्य देतो..!आणि कष्टाच्या रुपात जो लक्ष्मीरुपात जो राम असतो तो मिळण्याऱ्या मोबदल्यात,धनात असतो..!

सारी रामाचीच रूप..!

प्रत्येक गोष्टीत रामाचं अस्तित्व शोधण ही रामाची अनन्य भक्ती..!
प्रभू रामरायांनी दिलेल्या कंठींकेत,प्रत्येक मण्यात तो फोडून राम शोधणारा हनुमंत समर्थांचा आदर्श..!

ज्याच्यात राम नसेल ती वस्तू,जागा,मोह,आयुष्य समर्थाना विलक्षण परक होत..!
किंबहुना रामस्पर्श नसलेल अस्तित्व त्यांना पूर्ण त्यागमय होत..!

अशा गोष्टींच,वस्तूंच ओझं समर्थाना कधीच मान्य न्हवत..!

पण अनेकवेळा अस होत की व्यवहार म्हणून अशा गोष्टी माणूस मान्य करू लागतो..!
अशा गोष्टी ज्यात राम नाही,सत्व नाही अशा गोष्टी केवळ लोकानुनय म्हणून कराव्या लागतात अस आपण मानतो..!

समर्थाना याच धोक्याची पूर्ण जाणीव आहे..!अस रामविरहीत आयुष्य माझ्या अंगवळणी पडून देऊ नकोस ही समर्थांची रामकडे मागणी स्वगुणपरीक्षेचा एक नवीन आयाम आहे..!

त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अचल अस तुझं अस्तित्व शोधायची,तुझं गुणगान गाणार माझं मन अस्तित्वात आणणार अस मन रामा तूच मला देशील अशी खात्री आहे..अस समर्थ म्हणतात..!

अस एक अबाध्य वळण माझ्या बुद्धीला,दिनचर्येला मिळो..!

अस समर्थांच रामाजवळ कळकळीने मागण..!!

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment