समर्थांची करुणाष्टके (३)
कडवे तिसरे...
समर्थ म्हणतात..
रघुनायका दिन हाती धरावे...
अहंभाव छेदूनिया उद्धरावे..
अगुणी तयालागी गुणी करावे..
समर्थे भवसागरी उतरावे..!
रामराया..तुझ्यासारख्या सुखदाता,आनंददाता,कृपावंत,विर्यवान अशा दैवताने माझ्यासारख्या मुढ साधकाला हाती घेतल तर मला तुझ्यापर्यंत पोहोचण्यातसाठी ची वाट सुकर होऊन जाईल..!
रामराया...माझ्यातले अहंकाराचे बीज,देहभावाची ओढ,सुखाच व्यसन हे सगळे अवगुण मुळापासून छेदून टाकलेस तर मी तुझा भक्त होण्यासाठी थोडा लायक होईन..!
रामराया...माझ्यातले गुण जे तुझ्या भक्तीसाठी आवश्यक आहेत ते माझ्या अहंकार,देहबुद्धी आणि स्वार्थ याने विस्मृतीत गेले आहेत,त्यावर या सगळ्या अवगुणांचं मळभ दाटल आहे..ते बाजूला करून माझे गुण तू दाखवून देशील..जेणेकरून मी तुझ्या भक्तीत परिपूर्ण होऊ शकेन !
रामराया.. हे सगळं झालं तर मग मी या जगाच्या रोजच्या कार्यात,संसारात,प्रपंचात असून सुद्धा तुझ्या भक्तीपासून वंचित न होता सुखनैव आयुष्य कारणी लावू शकेन..!
समर्थ स्वतःच्या देह आणि मन यावर वेगवेगळे यथोचित संस्कार करून ईश्वरभक्तीच्या मार्गावर मला घेऊन जा अशी रामाजवळ विनवणी करतायत..!
आपण ही अशी विनंती करायला हवी होय ना..?
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment