समर्थांची करुणाष्टके (३), कडवे चौथे..

समर्थांची करुणाष्टके (३)

कडवे चौथे..

समर्थ म्हणतात...

किती भार घालू रघुनायकाला...
मज कारणे सीण होईल त्याला...
दीनानाथ हा संकटी धाव घाली...
तयाचेनि हे सर्व काया निवाली...!

रामराया...मला नेहमी अस वाटत की माझं सुख,माझी सुबत्ता,माझं वैभव हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे..तुझ्यावर भार आहे..!तूच त्यासाठी काळजी घेतोस..आणि तूच मला हे सारं पुरवतोस..! तुझ्यावर भार घालायच्या माझ्या प्रवृत्तीची माझी मलाच लाज वाटू लागली आहे..!

रामराया..मला माहिती आहे  कायम माझ्या सभोवती,माझ क्षेमकुशल,मंगल घडवण्यासाठी तू अपरंपार कष्ट घेतो आहेस..!मला खजील व्हायला होत की तू देवाधीदेव असून माझ्यासाठी इतका दमून जातोस...!!

रामराया,एवढंच नाही तर माझ्या सुखाच्या काळात ते देण्यासाठी तू माझ्याबरोबर असतोसच पण माझ्या दुःखाच्या,परीक्षेच्या काळात तू माझ्यासाठी धावून येतोस..!ते दुःख निवारण करून सुखाची बेगमी करतोस..!

रामराया..अस सगळं तुझं अस्तित्व सर्वकाळी माझ्याभोवती,माझ्या क्षुब्ध मनात एक शीतल छाया निर्माण करून जात..!आणि त्या तुझ्या कृपेच्या सावलीखाली माझं तनमन शांत निवांत होत जात...!!


समर्थ आपल्या भोवती रामराया ने ठेवलेल्या सुखप्राप्तीच्या मार्गाची जाणीव ठेवतात.तसच ते सुख निर्माण करण्यासाठी तो रामराया सदा सन्निध राहून एकप्रकारे कष्ट घेतोय अशी कबुली ही देतात..!

आपण ही आपल्या सुखाच्या वाटेवर घेऊन जाताना रामरायच त्या पायवाटेवर अनुभवतो ना?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment