समर्थांचे करुणाष्टक (२), कडवे दुसरे....

समर्थांचे करुणाष्टक (२)

कडवे दुसरे....

बहु दास रे तापसी तीर्थवासी..
गिरीकंदरी भेटी नाही जनासी..
स्थिती ऐकता थोर विस्मित झालो..
तुझा दास रे व्यर्थ जन्मासी आलो...!

रामा..तुला मिळवण्यासाठी प्रत्येक जण तप करतोय फक्त प्रत्येकाची तपपद्धती वेगवेगळी..शाररिक कष्टाने,मानसिक कष्टाने..काहीजण जमेल तस तप करतायत..!
सगळ्यांच इप्सित,साध्य रामा तूच आहेस..!
अशा सगळ्या मानवाकडे,त्यांच्या वैयक्तिक तपाकडे बघून मला कुतूहल,आश्चर्य वाटत..!

रामराया..काहींची तप तर यापेक्षा कठोर असतात..!स्वतःच्या देहाला अतीव कष्ट घेत,स्वतःच्या सहनशक्तीची परीक्षा घेत..मानसिक शक्तीची परिसीमा गाठत हे तपश्री एकांतात,विजनवासात,गुहेत,कुटी बांधून समाजापासून दूर फक्त रामा तुझी आराधना करतायत..!
किती प्रकारे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री मला हेच दिसतंय..!

रामा..हे सगळं बघून माझ्यामनात खंतवजा आश्चर्य वाढू लागल आहे..!ही माझी आश्चर्यचकित अवस्था ही माझी तुझ्या दर्शनाची भूक जास्त वाढवतीये..!

रामा..पण हे सगळं मला अजून जमत नाहीये..!हे शाब्दिक,मानसिक तप पुरे पडतंय अस मला वाटत नाही..!
आणि मग माझं शरीर,माझी काया या जगात येऊन वाया चालली आहे..याची जाणीव होतीये..तुझ्याशिवाय माझं आयुष्य व्यर्थ चाललय हे कळू लागलंय..!!

समर्थाचे शब्द आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावतात..!
आपल्याला जर हा जन्म व्यर्थ घालवायचा नसेल तर त्यांनी घालून दिलेली रामकृपेची पायवाट ही आपल्याला चाललीच पाहिजे..!

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment