समर्थांच करुणाष्टक (२) कडवे पाचवे...

समर्थांच करुणाष्टक (२)

कडवे पाचवे...

समर्थ म्हणतात..

बहुसाल देवाळये हाटकाची..
रसाळा कळा लाघवें नाटकाची..
पूजा देखतां जाड जीवी गळालो..
तुझा दास मी वेर्थ जन्मासी आलो..!

रामराया..तुझं मंदिर म्हणजे एक मुक्तीस्थळ असत.कितीही वेळा तिथे आलं तरी मन भरत नाही..तुझी षोडशोपचार पूजा ,तुझी अंगपूजा रोज  अव्याहत पहातोय..!ही पूजा एक चित्रकथी,एक सुंदर नाटक पहातोय इतका मी त्यात नेहमी गुंग होऊन जातो..!

रघुवीरा..तुझा तो रसाळ दृष्टीक्षेप,सुमधुर हास्य,लक्ष्मण सीतामाई  बरोबरची आश्वासक आमच्या आयुष्यातली साथ..हे सारं केवळ मुग्ध करणार आहे..!

रामा.. पण हे सगळं बघताना मला माझ्या असमर्थतेची ही आठवण होते..!प्रत्यक्ष तर नाहीच..मानसपूजेत ही तुझ्यासाठीचे हे सोळा संस्कार,उपचार मी एकाग्रतेने करू शकत नाही..!तेवढी तुझ्याशी माझ्या मनाची तन्मयता अजून ही जुळत नाहीये..!

रामा..किती रे प्रयत्न करू अजून मी..?मला अजूनही तुझ्या उपासनेत सर्वस्व ओतता येत नाहीये..आणि त्यामुळे माझ्या भक्तीहीन देहाचा भार अकारण भूमीवर पडून माझं आयुष्य व्यर्थ चाललय..!जन्म व्यर्थ होत चाललाय..!

वयाच्या बाराव्या वर्षी रामकृपा होऊन ही समर्थ इतक्या लिनतेने रामरायाला विनवत आहेत..!

ही आर्त विनयशीलता आपण ही अंगात बाणवूया  हो ना??

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment