Karunaashtak 10

कडवे दहावे...

समर्थ म्हणतात...

तुजविण मज तैसे जाहले देवराया...
विलग विषमकाळी तुटली सर्व माया..
सकळजन सखा तू स्वामी आणिक नाही..
वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही...!

जन्म घेतल्यानंतर मनुष्याच्या एका अवस्थेच वर्णन समर्थानी यात केलंय..!

गर्भात असताना सोहमचा जप करणारा जीव जन्मानंतर लगेच कोहम जपू लागतो..!जी जिवंत नाळ परमात्म्याशी जोडलेली असते ती शाररिक आणि मानसिक रित्या छेदली जाते..!
त्या परमात्म्याशी अंतर वाढत जाते..आणि भौतिक जगामधील अंतर कमी होऊ लागते..!परमात्म्याला उद्देशून केलेली कृती तुजसाठी ऐवजी तुजविण होऊ लागते..!
आणि एक क्षण असा येतो की त्याक्षणी तो ईश्वर किती आपल्यापासून दूर गेलाय याची जाणीव होते..!
या क्षणाच वर्णन समर्थ या कडव्यात करतात..!

ते म्हणतात तुझ्यापासून दूर असताना आणि मी काही त्रासात,दुःखात थोडक्यात  आयुष्यातल्या काही विषम अवस्थेत मायेची सगळी माणस, आधार वाटणारे हात सगळे साथ सोडतात..!
माया ही उंबऱ्यापर्यंतच थांबते..!

पण अशा क्षणी सगळ्या विश्वाचा तारक, मित्र,सखा म्हणून भक्तांनी बिरुद लावलेला तू माझ्या या सगळ्या अस्वस्थतेत एकमेव त्राता म्हणून उदयाला येऊ पहातोस..!

पण अशा वेळी पुन्हा विषयसुखाचे पाश,आशा,ममता,व्यवधाने सगळं मला मागे ओढू पाहतात..!

पण मी मात्र आता तुझ्या निस्सीम ,अलख स्वरूपाकडे आकृष्ट होत चालल्यामुळे ते सगळे पाश शिसारी येऊन माझ्या मनातून,शरीरातून बाहेर फेकत चाललोय...त्यांचा त्याग करत चाललोय..!

समर्थ त्यांनी रामकृपा मिळवण्यासाठी त्यांनी आचरलेली तत्वे,त्यांनी स्वतःवर घालून घेतलेले नियम स्वतः आपल्या आचरणासाठी खुले करतायत..!

आपण फक्त त्यांचा कित्ता गिरवायचाय..
मग त्यांना मिळालेली  रामस्वरूपाची पासूनभिक्षा आपल्याला ही प्राप्त होईल  ना?
नक्कीच होईल..!

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment