Karunaashtake 11

 कडवे अकरावे..

समर्थ म्हणतात...

स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे..
रघुपतीवीण आता चित्त कोठे न राहे..
जिवलग जीव घेती प्रेत सांडून जाती...
विषय सकळ नेती मागुता जन्म देती..!

एक विदारक सत्य..!
सगळ्या पाशात गुंतलेल्या एका जिवाच यथार्थ आणि अंतिम वर्णन..!

मी कमावलेल्या धनाचा,माणसांचा मला उपयोग आहे हा गैरसमज घेऊन मी माझं जीवन जगतोय..!माझ्या भोवतीच मला मिळणार ऐश्वर्य हेच माझं आयुष्यच इप्सित आहे अस मी समजतोय..!

पण रामराया या सगळ्यात, आहे त्यात सुख मानायचं असा कानमंत्र तूच आम्हाला संताकरवी दिलास ना..?

मग आता हे सुद्धा आम्हाला समजावत नाहीस की हे सुख तुमचं अंतिम ध्येय नाही..ही आसक्ती तुमचं कल्याण करणार नाही..!
हे चित्त,मन जे काही तुम्हाला दिलं ते तुला (रामाला) स्मरण करून मग हे सुख भोगण्यासाठी दिलेलं आहे..!

या शरीरातील जीव नावाच एक चैतन्य एकदा संपलं की हातावरचा ऐवज काढून घेऊन जवळच्या व्यक्ती त्याच प्रेत करून ते सोडून देणार आहेत..!
या शरीराने आत्तापर्यंत संभाळलेली नाती,ममत्व,कष्ट सगळं सोडून केवळ एक निष्प्राण देह म्हणून त्याचा त्याग करणार आहेत..!

आणि एवढं सगळं घेऊन सुद्धा त्या देहाला चिकटलेला दंभ,दर्प,आसक्ती जर तशाच राहिल्या तर जन्ममरणाचा फेरा पुन्हा आहेच..!पुन्हा तेच चक्र..!

रामा थांबव हे..!तू आसक्तीच ठेऊ नकोस या देहात..!या जन्मीच मला निरिच्छ करून टाक..!
पुन्हा तोच जन्म,तेच  जिवलग,तीच आसक्ती,तेच मरण..काही नको ..!

आता फक्त रामस्वरूप कायमच..!🙏

©प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment