Karunaashtak - 9

समर्थांचे करुणाष्टक..

पायरी नववी...

कडवे नववे...

समर्थ म्हणतात....

जननी जनक माया लेकरू काय जाणे..
पय न लगत मुखी हाणता वत्स नेणे..
जळधरकण आशा लागली चातकासी..
हिमकर अवलोकी पक्षीया भूमीवासी...!

हे समर्थांच हुकुमी भाषासामर्थ्य..!उत्तम निरीक्षणशक्ती..आणि निश्चित अपेक्षेप्रमाणे परिणाम घडवून आणणारी शब्दरचना..!

करुणाही बहुआयामी आहे त्यांची..!कोणतं उदाहरण कोणत्या प्रसंगासाठी द्यायचं हे त्यांच्या लेखनात प्रकर्षाने कळत..!
दृष्टांत दिला की विषय पटतात..!समर्थ भक्तीने ओतप्रोत होऊन स्वतःची भक्ती,तळमळ प्रत्यक्ष रामालाही समजवून सांगतायत..!

आईवडिलांच प्रेम हे अपत्यावर असणं सहाजिक आहे..!ते आहे हे दाखवण्यासाठी आईवडिलांना विशेष काही प्रयत्न करून दाखवावे लागत नाहीत..!वात्सल्य ही दाखवायची,प्रदर्शनाची गोष्ट नाही..!पण लेकरू मात्र आई,बाबा करत त्यांना जाणीव करून देत असत..!कारण लेकरू आजण असल्याने त्या वात्सल्यापासून अनभिज्ञ असत..!
समर्थ म्हणतात ..रामा तुझं माझ्याकडे लक्ष असणारच..कारण तूच माझा पालनकर्ता आहेस पण मी आपला अजाणपणे या करुणेद्वारे तुला सारखी हाक मारतोय..!
तुला माझी आठवण आहे की नाही याची सारखी खात्री करून घेतोय..!

वासरू गायीच्या अचळापाशी जात पण त्याच्या मुखात लगेच दूध येत नाही..!त्यासाठी गाय हलकेच पायाला थोडा हिसका देते.. गायीची कृती ही वासराला त्रास होण्यासाठी नसून त्याला दूध मिळण्यासाठी पान्हा फुटावा यासाठी असते..!
तसच तू माझ्या आयुष्यात मला दिलेले काही क्षण असतील की त्यात मला त्रास झाला असेल तर तो त्रास या प्रकारचाच आहे..!तू मला वाट पहायला लावणं हे तुझ्या लवकर दर्शनाच द्योतकच आहे..!पण मला मुढाला हे कळतय पण वळत नाही...!!

मी आपला आकाशातून पाण्याच्या कणांची केंव्हा बरसात होतीये याची वाट पहात बसलेल्या पक्षासारखा अधाशी तुझ्या स्वरूप दर्शनाची वाट पहात बसलोय..!
आणि तसच चातकाप्रमाणे ते तुझ्या कृपास्पर्शाचे चांदणकण मला कधी मिळतायत या आशेत जन्मोजन्मी वाट पहात बसलोय..!

सुंदर प्रतिभा..!समर्थ सउदाहरण रामाला,आणि त्याबरोबरच ही तळमळ कशी असावी ह्यासाठी हे सगळे दृष्टांताच्या माध्यमातून समजावून सांगतायत..!

आपण सुद्धा आपली रामरायाला भेटण्याची ही  तळमळ अशाच प्रमाणे रामाला कळवायला नको का???

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment