समर्थांची करुणाष्टके (३), कडवे पाचवे.

समर्थांची करुणाष्टके (३)

कडवे पाचवे.

समर्थ म्हणतात...

मज कोंवसा राम कैवल्यदाता..
तयाचेनि हे फिटली सर्व चिंता..
समर्था तया काय उत्तीर्ण व्हावे...
सदा सर्वदा नाम वाचे वदावे...!

रामराया..माझ्या सर्वदूर विचारात,कल्पनेत मी माझ्या सुखाचा विचार करतो तेंव्हा मला फक्त तुझा आधार वाटतो..!तुझी  कैवल्यकृपा हीच माझ्या आयुष्याची एकमेव तारणहार आहे..!

रामराया...माझ्या समोर असलेली अनेक पारमार्थिक,सामाजिक कोडी केवळ तुझं अस्तित्व असेल तर निमिषात दूर होऊ शकतात.तू आयुष्यात असलास की कोणतीच चिंता रहात नाही हा माझा अनुभव आहे..!

रामराया..तू खरा तर खूप दयावान आहेस..!आर्त भक्तीला लगेच प्रतिसाद देतोस.प्रसन्न होतोस.कृपा करतोस..!पण एवढं असून ही मी तुझ्या या भक्त परीक्षेत का उत्तीर्ण होत नाही हे लक्षात येत नाहीये..!

रामराया...मला आता तुझ्या कृपेच एक इप्सित जाणत्या लोकांकडे बघून सापडलंय.आणि ते म्हणजे तुझं नाम..!या रामनामाच्या आधारेच तुझी कृपा मिळवू शकतो हे मला समजलय..!

समर्थानी आपल्याला त्यांच्या साधनेच्या अनुभवानुसार रामाची कृपा  मिळण्यासाठी फक्त रामनाम ह्या उपासनेची कास धरा इतकं प्रखरपणे सांगितलंय..!!
आपण तेवढंच ऐकूया ना? कारण ते समर्थ आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment