समर्थांची करुणाष्टके..(४), कडवे पाचवे...

समर्थांची करुणाष्टके..(४)

कडवे पाचवे...

समर्थ म्हणतात

नको द्रव्यदारा नको येरझारा..
नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा...
सगुणी मज लावी रे भक्तीपंथा..
रघूनायका मागणे हेचि आता..!

रामराया..प्रत्येक दिवशी माझी पूर्ण क्रयशक्ती ही अर्थार्जन,उदरभरण,इंद्रियसुख यासाठी खर्च होत चाललेली आहे..प्रपंचाची ऐहिक जोडणी करत माझी शाररिक आणि मानसिक घालमेल होऊ लागली आहे..!जी आता मला नकोशी वाटू लागली आहे..!

रामराया..या सगळ्या प्रापंचिक उठाठेवी करताना मला माझं अनुभवाच आणी मिळवलेलं शैक्षणिक चातुर्य, बळ वापरायला लागत आहे..!त्यातून मी काहीवेळी यशस्वी झालो पण मग स्वतःच्या बुद्धिबद्दल उगीचच गर्व वाटू लागतो आहे..!

रामराया..या सगळ्या नकोश्या झालेल्या उपाध्याना मी कंटाळलो आहे..!मला आता तरी तुझ्या भक्तीची वाट दाखव..म्हणजे तुझ्याशी एकरूप होण्याची पहिली पायरी जी सगुणभक्ती आहे ती तरी मला प्राप्त होईल...!

रामराया.. ही सगुण भक्ती,ही प्रपंच,उपाधीची मुक्ती मला आता तरी प्राप्त करून दे ही प्रार्थना मी वारंवार करतोय..!!

समर्थ त्यांच्या साधनेतील भक्तीची कवाड आता उलगडू लागले आहेत.!प्रपंच निरिच्छता,वैषयीक उदासीनता यामुळे निर्माण होणाऱ्या सगुणभक्तीच्या दिशेच इथे वर्णन करतायत..!
आपण ही सगुणभक्ती अनुभवूया ना??

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment