समर्थांची करुणाष्टके (४), कडवे चौथे

समर्थांची करुणाष्टके (४)

कडवे चौथे

समर्थ म्हणतात..

सदा सर्वदा योग तुझा घडावा..
तुझे कारणी देह माझा पडावा..
नुपेक्षी मज गुणवंता अनंता..
रघुनायका मागणे हेचि आता...!

रामराया..अहर्निश जगतोय,श्वास घेतोय..मला या प्रत्येक घटिकेला तुझं अस्तित्व व्यापून असावं..माझ्या पूर्ण आयुष्यावर तुझ्या कृपेची छाया भरून उरावी असा ध्यास मनाने घेतलाय..!

रामराया..तुझ्या संकीर्तनात,तुझ्या भक्तीत,तुझ्या सेवेत माझा देह झिजून गेला तरी चालेल..मला तुझ्या सख्यत्वाच चंदन प्राप्त होईल..!!

रामराया..पण हे सगळं मी तुला मागतोय,फक्त मागतोय..पण याचा कंटाळा येऊन तू माझी उपेक्षा करणार नाहीस याची खात्री आहे..कारण तु कृपासागर आहेस..अनंत आहेस..अपरिमित गोडवा आहेस..!

रामराया..हे सगळं माझ्यासाठी करावंसं..माझ्या जगण्याच इप्सित साध्य करून घ्यावस ही मागणी मी तुझ्याकडे नाही करणार तर कुणाकडे करणार..?

समर्थ या कडव्यात आयुष्यच फलित सांगतात.जन्माला येऊन मनुष्याने काय साध्य करायचे हे ते आवर्जून सांगतात..आणि त्याप्रमाणे त्यांनी ते साध्य केलेलं ही आहे..!
आपल्याला ही ह्या साध्याची प्राप्ती व्हावी ही सुद्धा प्रार्थना समर्थांकडे,रामाकडेच आपण करूया...!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment