समर्थांची करुणाष्टके (५) कडवे दुसरे.

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे दुसरे.

समर्थ म्हणतात...

मन हे आवरेना की..
वासना वावडे सदा..
कल्पना धावते सैरा..
बुद्धि दे रघुनायका...!


रामराया...तूच या शरीरात दिलेलं मन आहे ना ते मन ही आता अति चंचल होऊ लागलंय.हे चांचल्य मला,माझ्या वृत्तीला आवरता येत नाहीये.या कल्पनेची मुख्य उत्पत्ती जी वासना,अतिरेकी स्वप्न आता हे ही आता नको वाटतेय..पण सदा हे सगळं मनात डोकावतय..!हे चंचल मन ही कल्पनाशक्ती,वासनाशक्ती घेऊन सैराट अवस्था निर्माण करतीये..!
इतकं सगळं मानसिक द्वंद्व चाललय रामा आता या सगळ्यातून सावरायची बुद्धी तू मला देशील..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment