जागतिक हास्य दिनाच्या निमित्ताने...
समर्थांचा विनोद..
समर्थानी दासबोधात टवाळा आवडे विनोद. अशी फक्त एक उक्ती वापरल्याने काही वसंत कानेटकर यांच्यासारख्या समीक्षकांनी समर्थाना विनोदाच वावडे आहे असा निर्णय देऊन टाकला..!
वास्तविक पाहता भाषाप्रभु असलेले समर्थ हे आयुष्यातल्या,परमार्थाच्या,संसारातल्या प्रत्येक रंगाची,बाजूची जाण असलेले आहेत.
समर्थ टवाळा आवडे विनोद असे म्हणून विनोद आणि तो करणाऱ्यांच मूल्यमापन करतात ते अभ्यासपूर्ण..!
या उक्तीचा अर्थ दुसरा अर्थ असा होतो की टवाळखोराना फक्त विनोद,भाषिक टोमणे एवढेच आवडतात.!
त्यामागे गर्भितार्थ, हलकेफुलकेपणा,भाषाशास्त्र किंव्हा बुद्धि असे काहीच नसते.
वास्तविक रित्या समर्थांनी रचलेली भारुडे,काव्ये असे अनेक प्रकार आहेत.की ज्यात त्यांची विनोदबुद्धी दिसते.
यातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग जेंव्हा ३६ वर्षानंतर आईला भेटायला समर्थ जेंव्हा गेले तेंव्हा त्यांचा बलदंड पण थोडासा अघोरत्वा कडे झुकलेला चेहरा व शरीरयष्टी बघितल्या वर आईला शंका आली की नारायणाला भूतबाधा तर झाली नसेल..??
त्यावेळी समर्थानी दिलेलं उत्तर त्यांच्या विनोदबुद्धीची उंची दाखवत..!
समर्थ म्हणतात..
होते वैकुंठेचे कोनी.
शिरले आयोध्याभुवनी..
लागे कौसल्येचे स्तनी..
तेची भूत गे माये..
सर्व भूतांचे हृदय..
नाम त्याचे रामराय..
रामदास नित्य गाय..
तेची भूत गे माये...!
ह्या विनोदात काळजी, श्रद्धा, शाब्दिक कोटी,स्वपरिक्षा,स्वओळख आणि उपदेश हे सारं आहे..!
इतका सर्वांगीण विनोद करू शकलेल्या समर्थाना विनोदाच वावडे कस असेल..?
दासबोधात ठीकठिकाणी अनेक शाब्दिक कोट्या समर्थानी केल्या आहेत.!किर्तनभक्ती,स्वगुणपरीक्षा समासात तर त्यांनी त्याचा मुबलक वापर केला आहे.
आळशीपणा,निद्रानिरुपण यामध्ये त्यांनी अनेक मनुष्य अवस्था साकारल्या आहेत त्यात उत्तम विनोदनिर्मिती झाली आहे.
मुर्खलक्षणामध्ये ज्यामुळे विनोद निर्माण होतात असे अनेक स्वभावविशेष समर्थांनी वर्णन केले आहेत.
समर्थ नेहमी फक्त विनोदापेक्षा त्याच्या उच्च पातळी,उत्तम कसदार असण्याबद्दल आग्रही आहेत.
समर्थांच्या साहित्यात उपरती ही एक अतिशय महत्वाची अवस्था मानली गेलीये..!
त्यात त्यांनी स्वतःवर केलेले अनेक विनोद आणि त्यामुळे स्वतःचे झालेले हसे हे सुदधा स्वतःहुन वर्णन केले आहेत.!
स्वतःवर विनोद करणाऱ्याला स्वतःतला माणूस कळतो.त्याच साक्षेपी मूल्यमापन करता येत.
समर्थांचा विनोद केवळ करमणूक नाही तर तो एक उत्तम भाषासौष्ठवाचा नमुना आहे.सर्वांगीण,सर्वशक्त..!
विनोदाचा अतिरेक त्यांना मान्य नाही.समर्थांचा विनोद स्वत्विक तर आहेच पण तो विचारी ही आहे.!
थोडक्यात समर्थांचा विनोद हा सुद्धा सारखाच समर्थ आहे..!!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२५३५९०२
समर्थांचा विनोद..
समर्थानी दासबोधात टवाळा आवडे विनोद. अशी फक्त एक उक्ती वापरल्याने काही वसंत कानेटकर यांच्यासारख्या समीक्षकांनी समर्थाना विनोदाच वावडे आहे असा निर्णय देऊन टाकला..!
वास्तविक पाहता भाषाप्रभु असलेले समर्थ हे आयुष्यातल्या,परमार्थाच्या,संसारातल्या प्रत्येक रंगाची,बाजूची जाण असलेले आहेत.
समर्थ टवाळा आवडे विनोद असे म्हणून विनोद आणि तो करणाऱ्यांच मूल्यमापन करतात ते अभ्यासपूर्ण..!
या उक्तीचा अर्थ दुसरा अर्थ असा होतो की टवाळखोराना फक्त विनोद,भाषिक टोमणे एवढेच आवडतात.!
त्यामागे गर्भितार्थ, हलकेफुलकेपणा,भाषाशास्त्र किंव्हा बुद्धि असे काहीच नसते.
वास्तविक रित्या समर्थांनी रचलेली भारुडे,काव्ये असे अनेक प्रकार आहेत.की ज्यात त्यांची विनोदबुद्धी दिसते.
यातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग जेंव्हा ३६ वर्षानंतर आईला भेटायला समर्थ जेंव्हा गेले तेंव्हा त्यांचा बलदंड पण थोडासा अघोरत्वा कडे झुकलेला चेहरा व शरीरयष्टी बघितल्या वर आईला शंका आली की नारायणाला भूतबाधा तर झाली नसेल..??
त्यावेळी समर्थानी दिलेलं उत्तर त्यांच्या विनोदबुद्धीची उंची दाखवत..!
समर्थ म्हणतात..
होते वैकुंठेचे कोनी.
शिरले आयोध्याभुवनी..
लागे कौसल्येचे स्तनी..
तेची भूत गे माये..
सर्व भूतांचे हृदय..
नाम त्याचे रामराय..
रामदास नित्य गाय..
तेची भूत गे माये...!
ह्या विनोदात काळजी, श्रद्धा, शाब्दिक कोटी,स्वपरिक्षा,स्वओळख आणि उपदेश हे सारं आहे..!
इतका सर्वांगीण विनोद करू शकलेल्या समर्थाना विनोदाच वावडे कस असेल..?
दासबोधात ठीकठिकाणी अनेक शाब्दिक कोट्या समर्थानी केल्या आहेत.!किर्तनभक्ती,स्वगुणपरीक्षा समासात तर त्यांनी त्याचा मुबलक वापर केला आहे.
आळशीपणा,निद्रानिरुपण यामध्ये त्यांनी अनेक मनुष्य अवस्था साकारल्या आहेत त्यात उत्तम विनोदनिर्मिती झाली आहे.
मुर्खलक्षणामध्ये ज्यामुळे विनोद निर्माण होतात असे अनेक स्वभावविशेष समर्थांनी वर्णन केले आहेत.
समर्थ नेहमी फक्त विनोदापेक्षा त्याच्या उच्च पातळी,उत्तम कसदार असण्याबद्दल आग्रही आहेत.
समर्थांच्या साहित्यात उपरती ही एक अतिशय महत्वाची अवस्था मानली गेलीये..!
त्यात त्यांनी स्वतःवर केलेले अनेक विनोद आणि त्यामुळे स्वतःचे झालेले हसे हे सुदधा स्वतःहुन वर्णन केले आहेत.!
स्वतःवर विनोद करणाऱ्याला स्वतःतला माणूस कळतो.त्याच साक्षेपी मूल्यमापन करता येत.
समर्थांचा विनोद केवळ करमणूक नाही तर तो एक उत्तम भाषासौष्ठवाचा नमुना आहे.सर्वांगीण,सर्वशक्त..!
विनोदाचा अतिरेक त्यांना मान्य नाही.समर्थांचा विनोद स्वत्विक तर आहेच पण तो विचारी ही आहे.!
थोडक्यात समर्थांचा विनोद हा सुद्धा सारखाच समर्थ आहे..!!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२५३५९०२
No comments:
Post a Comment