समर्थांची करुणाष्टके (५) कडवे एक

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे एक.

समर्थ म्हणतात...

युक्ती नाही बुद्धि नाही
विद्या नाही विवंचिता..
नेणता फक्त मी तुझा...
बुद्धी दे रघुनायका...!

रामराया...

मी,माझा प्रपंच,माझं जगणं हे सारं आता तूच आहेस.पण या व्यवहारी  जगात जगण्यासाठी आपल्याला व्यवहार नावाचं चातुर्य वापरावं लागत ना..?आणि ते ही सहज मनाने वापरण हे या भौतिक जगात शक्य नाही..!त्याला सावधानता,कुशलता लागते.ती प्राप्त कशी करायची यासाठी विद्या लागते..!पण या सगळ्या व्यवहारिक जगापासून दूर व्हायचा संकल्प असल्यामुळे मी या बाबतीत मी अज्ञानी रहातोय अस मला वाटायला लागलं आहे.पण रामराया मी तुझा भक्त आहे ना..मला  सांभाळून घे..मला या सगळ्याची बुद्धी दे...!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment