समर्थांची करुणाष्टके (५) कडवे आठवे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे आठवे...

समर्थ म्हणतात...

संसारी श्लाघ्यता नाही.
सर्वहि लोक हासती..
विसरू पडतो पोटी..
बुद्धी दे रघुनायका..!

रामराया...माझा संसार मग तो प्रपंचातला असो किंव्हा परमार्थातला असेल त्यात प्रवाहीपणा नाहीये.एकसंधता नाहीये.आणि माझ्या वागणुकीच,समाजातील वावराच हसू होऊ लागल आहे.समाजमनाला माझा विसर पडू लागला आहे.मी असून नसल्यासारखा झालो आहे.
रामराया..हे सगळ सुरळीत  करायची बुद्धी मी तुला मागतोय..!ती बुद्धी रघुनायका मला देशील ना?..!


श्रीराम.!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment