समर्थांची करुणाष्टके (५) कडवे नववे..

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे नववे..

समर्थ म्हणतात..

चित्त दुश्चित्त होता हे..
ताळतंत्र कळेचिना..
आळसू लागला पाठी..
बुद्धि दे रघुनायका...!

रामराया.. माझं मनच माझ्या विरुद्ध झाल्यासारखं आहे.म्हणजे मला ध्यास तुझा लागलाय..आणि मन हे भौतिक सुखाकडे मला ओढू लागलं आहे.मी त्याला तुझ्याकडे घेऊन जायचा प्रयत्न करतोय पण ते नेमकं उलटी कडे जातंय.तुझ्या समचरणाची ओढ,त्याची पायवाट मी एकाग्रपणे चालू शकत नाहीये.कोणत्याच यमनियमांची तमा न बाळगता हे मन विद्ध होत चालल आहे.आणि त्या मागे धावता धावता,त्याला आवरता आवरता माझी मानसिक थकवणूक होत चाललीये..आळस,दुश्चित्त पणा हा वाढू लागला आहे..!याचा अर्थ असा नाही की मी त्याला भुलतोय. पण तरीही ही माझी कसोटीची वेळ आहे हे नक्की..!
रामराया..हे सगळं मनाच मानीपण ताब्यात ठेऊन ते मला तुझ्याकडे वळण्याची कृतबुद्धी आता तरी मला दे ना रे..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment