समर्थांची करुणाष्टके (५) कडवे बारावे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे बारावे...

समर्थ म्हणतात..

देईना पुर्विना कोण्ही..
उगेची जन हासती..
लौकीक राखिता येना..
बुद्धि दे रघुनायका..!

रामराया...मला अपेक्षा  खूप आहेत.पण त्या पारमार्थिक जास्त हव अस वाटू लागलं आहे...आणि ऐहिक, भौतिक याची गरज कमीनाचे पण तेही आता कोणाकडून मिळत नाही आणि मला मागवत नाही.कारण भौतिक सुख माझं पूर्ण समाधान करत नाहीत.आणि पारमार्थिक सुखाची ओढ मला त्या सगळ्या मायेत गुंतून देत नाहीये.माझी ही एकंदरीत अवस्था बघून लोक माझी चेष्टा करू लागले आहेत.कारण माझं व्यक्तित्व मला एक दिशा देत नाहीये.हास्यास्पद होत चालले आहे.मला माझ्या आयुष्याची कमीत कमी ओळखही या समाजात निर्माण करता येत नाहीये.काय करू रामराया...?

मला ही ओळख निर्माण करायची आणि समाधान अंगी बाणवता येईल अशी  स्थिर बुद्धि दे रे रामा...!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment